किमान तापमान : 30.4° C
कमाल तापमान : 31.46° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.42 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.46° C
27.88°C - 31.99°C
few clouds27.79°C - 30.46°C
sky is clear27.79°C - 30.02°C
few clouds27.76°C - 30.17°C
sky is clear28°C - 29.92°C
scattered clouds28.13°C - 30.82°C
broken clouds– लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी,
मुंबई, (२९ जानेवारी) – सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला विविध हिंदू संघटना आणि हिंदू बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोर्चात भाजपाचे नेते सहभागी झाले होते. मुंबईतील शिवाजी पार्क येथून या मोर्चाला सुरुवात झाली. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात भाजपाच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले होते. मोर्चा ज्या ज्या भागातून जात होता, तेथे भगवामय वातावरण दिसत होते. मोर्चातील महिलांचा मोठ्या संख्येतील सहभाग लक्षणीय होता. दादर येथील मैदानातून निघालेला या मोर्चाचा प्रभादेवी येथील कामगार मैदानावर समारोप झाला. रविवारी सकाळी १० वाजतापासून या हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. लव्ह जिहादविरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकर्याला जन्मठेपेची शिक्षा द्या, आदी अनेक मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. हातात भगवे झेंडे, अंगात भगवे कपडे घालून हजारो लोक शिवाजी पार्कला एकवटले होते.
या मोर्चात भाजपा नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या मोर्चात सामील झाले आहेत तसेच शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि सदा सरवणकर यांनीही यात सहभाग नोंदविला.