किमान तापमान : 28.04° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 0.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
27.73°C - 30.24°C
sky is clear27.7°C - 30.01°C
sky is clear27.58°C - 29.99°C
sky is clear27.91°C - 30.39°C
sky is clear28.02°C - 30.38°C
scattered clouds28.04°C - 30.47°C
sky is clear=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय=
मुंबई, [२० जानेवारी] – राज्यातील २०१४-१५ च्या गाळप हंगामातील उसाचा खरेदीकर माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाने शेतकर्यांना एफआरपीनुसार (रास्त किफायतशीर दर) ऊस दर देण्यास साखर कारखान्यांना मदत होणार आहे. तसेच खुल्या बाजारात साखरेचे कोसळलेले दर पहाता एफआरपी देण्यासाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध झाली पाहिजे, अशी मागणी सहकारी साखर कारखान्यांकडूनही करण्यात येत होती.
राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकर्यांना दिलेल्या उसाच्या किंमतीवर ऊस खरेदीकर आकारण्यात येतो. ही आकारणी महाराष्ट्र ऊस खरेदी कर अधिनियम-१९६२ मधील तरतुदीनुसार केली जाते. हा खरेदीकर २०१४-१५ च्या गाळप हंगामासाठी माफ करण्यात यावा, असा प्रस्ताव सहकार विभागाने सादर केला होता. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफआरपी एवढी रक्कम शेतकर्यांना देणे सहकारी साखर कारखान्यांना सुलभ व्हावे, यासाठी आर्थिक सवलत म्हणून हा खरेदीकर यंदाच्या गाळप हंगामासाठी माफ करण्यात यावा.
यासोबतच सहवीज निर्मिती प्रकल्प राबविणार्या ज्या साखर कारखान्यांना ऊस खरेदीकरमाफीची सवलत मिळाली आहे, त्यांना जास्तीचा एक वर्षासाठी ऊस खरेदीकर माफ करण्याचा प्रस्ताव होता, त्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.