|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.09° C

कमाल तापमान : 30.23° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 62 %

वायू वेग : 4.02 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.09° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.48°C - 30.57°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.14°C - 31.11°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.47°C - 30.63°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.04°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.8°C - 30.07°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

28.08°C - 30.2°C

sky is clear
Home » महाराष्ट्र » काँग्रेस, राकाँसोबत जाताना नैतिकता कुठे गेली होती?

काँग्रेस, राकाँसोबत जाताना नैतिकता कुठे गेली होती?

– देवेंद्र फडणवीस यांचा सवाल,
मुंबई, (११ मे) – उद्धव ठाकरे यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर मु‘यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. मग भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवताना आपण आपली नैतिकता कोणत्या डब्यात बंद केली होती, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
उद्धव ठाकरे यांनी खुर्चीकरिता विचार सोडला तर एकनाथ शिंदे यांनी विचारांसाठी खुर्ची सोडली. ते सत्तेत होते, मंत्री होते. ते सत्ता सोडून विरोधकांकडे म्हणजे आमच्याकडे आले. हे लक्षात आल्यानंतर ठाकरे यांना कळलं की, आपल्याकडे संख्याबळ नाही, आपण हरणार आहोत. आपले लोक आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे लाजेपोटी, भीतीपोटी अविश्वासाच्या ठरावाला सामोरे न जाता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, असेही फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकशाहीचा, लोकमताचा विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फिरले. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळेला अपात्र सदस्यांच्या अपात्रतेच्या विषयावर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार अध्यक्षांकडे दिले. हे प्रकरण इतके असाधारण नाही की आम्ही त्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जे निर्णय घेतले आहेत, तसे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे. ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. त्यांना आम्ही कोणत्याही पद्धतीची बाधा आणू शकत नाही. एकाच पक्षावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक गटांनी दावा केल्यानंतर अध्यक्षांना याचा अधिकार आहे की ते राजकीय पक्ष कोणता आणि कोणाकडे आहे, हे निश्चित करू शकतात. राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी निमंत्रित केले हे योग्यच आहे, संवैधानिकच आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
घटनाबाह्य बोलणारे झाले कालबाह्य : एकनाथ शिंदे
आमचे सरकार घटनाबाह्य म्हणणार्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने चांगली चपराक बसली असून ते आता कालबाह्य झाले आहेत. सदस्यांच्या अपात्रतेबद्दल अध्यक्ष मेरीटप्रमाणे निर्णय करतील, असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आजही हे लोक म्हणतात की, आमच्याच पक्षाचा व्हिप लागणार… माणसे किती आहेत? तुम्ही धनुष्यबाण गहाण ठेवला. आम्ही तो वाचवला. त्याला वाचवण्याचं काम आम्ही केलं आणि निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना हे पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह दिले आहे. त्यामुळे फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे शिवसेना… शिवसेना… करत आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Posted by : | on : 11 May 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g