किमान तापमान : 29.33° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 2.89 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.12°C - 30.99°C
sky is clear28.81°C - 31.87°C
sky is clear28.58°C - 31.35°C
few clouds28.47°C - 30.26°C
few clouds28.66°C - 30.17°C
broken clouds28.35°C - 29.99°C
broken clouds-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश,
मुंबई, (०६ सप्टेंबर) – मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील अहवाल आठ दिवसांच्या आत देण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिला आहे. अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला आहे. या समितीला आधी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, मनोज जरांगे उपोषण मागे घेत नसल्यामुळे ही मुदत आठ दिवसांवर आणली आहे.
जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना आता या वादाला कुणबी विरुद्ध मराठा असे स्वरूप येऊ लागले आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना विदर्भाच्या धरतीवर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजे ओबीसी, म्हणून मराठा म्हणजे ओबीसी, अशी मांडणी जालन्यातील आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. त्याच मांडणीच्या आधारे त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवरून सध्या राज्यभरात रान पेटले आहे. सरकार या मागणीचे काय करायचे, याचे उत्तर शोधत थेट हैदराबाद गाठण्याच्या तयारीत आहे. मराठवाड्यातील निजामाच्या काळात मराठा समाजाच्या नोंदी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व मराठ्यांना कुणबी असे प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे करीत आहेत.
जरांगे यांचे उपोषण नवव्या दिवसांत
मनोज जरांगे यांचे उपोषण नवव्या दिवसांत पोहोचले असून, त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना सलाईनवर ठेवण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला होता, असे आरोग्य अधिकार्यांनी सांगितले.