किमान तापमान : 30.07° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 1.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.13°C - 30.99°C
sky is clear28.81°C - 31.29°C
sky is clear28.62°C - 30.72°C
sky is clear28.55°C - 29.71°C
few clouds28.63°C - 29.55°C
broken clouds28.39°C - 29.39°C
overcast clouds-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण सुरू,
मुंबई, (०६ सप्टेंबर) – राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकर्यांना ३५० रुपये क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रिद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात लाख लाख कांदा उत्पादक शेतकर्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी १० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात अनुदान जमा होणार आहे.
दहा कोटी पेक्षा जास्त कांदा अनुदानासाठी मागणी असलेले नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १० हजारपर्यंत सर्वांना अनुदान जमा होईल आणि दहा कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या या १० जिल्ह्यांतील ज्या शेतकर्यांची १० हजार पर्यंतची देयक आहेत, त्यांना पूर्ण अनुदान मिळणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांचे देयक १० हजार रुपये पेक्षा जास्त आहे, त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.