|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.49° C

कमाल तापमान : 33.16° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 7.32 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.16° C

Weather Forecast for
Monday, 06 May

28.07°C - 33.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.48°C - 30.68°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.18°C - 30.48°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

28°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.95°C - 29.94°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.81°C - 30.39°C

sky is clear
Home » महाराष्ट्र » त्रिशूळ युद्ध संग्रहालयाच्या उभारणीत जोडणे महाराष्ट्रासाठी भाग्याचे

त्रिशूळ युद्ध संग्रहालयाच्या उभारणीत जोडणे महाराष्ट्रासाठी भाग्याचे

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन,
– कर्नल सुनील शेओरन यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती,
लेह, (०३ सप्टेंबर) – लेहमध्ये सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार्या त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभारण्यात येत असून, हा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले.
लेहमधील कारू येथे त्रिशूळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. १४ कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा आणि आ. श्रीकांत भारतीय यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्रिशूळ हे उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक आहे. त्रिशूळ डिव्हिजननेसुद्धा असेच शौर्य कायम दाखविले आहे. जेथे श्वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी तुम्ही पराक्रम गाजवता आहात. आम्ही तुमच्या शौर्याला सलाम करतो. देशाचा सन्मान वाढविण्यात लष्कराची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यात त्रिशूळ डिव्हिजनचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
आज भारत सर्व क्षेत्रांत प्रगती करीत आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर आता भारताने सूर्याची मोहीम हाती घेतली आहे. भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. लष्करासाठी दुर्गम भागात रस्ते, पूल अशा सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केले जात आहे. या संग्रहालयामुळे सीमावर्ती भागात पर्यटनालासुद्धा मोठी चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील पर्यटक येतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
असे आहे त्रिशूळ संग्रहालय
सुमारे वर्षभरापूर्वी त्रिशूळ युद्ध संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. राज्य सरकारने हा निधी दिल्याबद्दल लेफ्ट. जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. त्रिशूळ युद्ध स्मारकानजीक हे संग्रहालय उभारण्यात येत असून, ते त्रिशुळाच्या आकाराप्रमाणे असणार आहे. यात तीन प्रदर्शन कक्ष असणार असून, त्यात १९६२, १९६५, १९७१, १९९१ आणि अगदी अलिकडच्या काळात झालेल्या कारवायांमध्ये हुतात्मा झालेल्यांच्या स्मृती असणार आहेत. हे त्रिशूळ डिव्हिजन साहसी जवानांचे असून, एकीकडे पाकिस्तान, तर दुसरीकडे चीन अशा दुहेरी क्षेत्रात भारताच्या अखंडतेसाठी ते कार्यरत असतात. या संग्रहालयात पाषणशिल्प, या त्रिशूळ डिव्हिजनच्या स्थापनेचा इतिहास, विविध अभियानांमध्ये मिळालेले यश, युद्धात वापरलेले शस्त्र, दारुगोळा, वाहने, संपर्क व्यवस्था, जवानांनी कुटुंबीयांशी केलेला पत्रव्यवहार इत्यादी बाबी असणार आहेत. १९६२ च्या युद्ध काळात या डिव्हिजनची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत १५० वीरता पुरस्कार या डिव्हिजनला मिळालेले आहेत.

Posted by : | on : 3 Sep 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g