किमान तापमान : 29.22° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 2.48 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.13°C - 30.99°C
sky is clear28.81°C - 31.29°C
sky is clear28.62°C - 30.72°C
sky is clear28.55°C - 29.71°C
few clouds28.63°C - 29.55°C
broken clouds28.39°C - 29.39°C
overcast cloudsजळगाव, (०५ सप्टेंबर) – जी-२० परिषदेतील भोजनाच्या निमंत्रणावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी, देशाचे नाव बदलण्याचा अधिकार कुणालाही नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी बुधवारी इंडिया आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांसोबत बोलावलेल्या बैठकीत पुढील सार्वत्रिक निवडणुकांसोबतच या विषयावर चर्चा होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.
देशाशी संबंधित नावावर सत्ताधारी का इतके अस्वस्थ आहेत, हेच कळत नसल्याचे शरद पवार यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. राज्यघटनेतील इंडिया हे नाव बदलले जाईल का, असा प्रश्न विचारला असता, मला याबाबत काहीच माहिती नाही. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांची बैठक मल्लिकार्जुन खडगे यांनी बुधवारी बोलवली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. ‘इंडिया’च्या बैठकीत या मुद्यावर चर्चा केली जाईल; पण देशाचे नाव बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही. कुणीही नाव बदलू शकत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.