|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.77° C

कमाल तापमान : 28.52° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 66 %

वायू वेग : 3.36 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.77° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.39°C - 30.57°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.14°C - 31.11°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.47°C - 30.63°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.04°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.8°C - 30.07°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

28.08°C - 30.2°C

sky is clear
Home » महाराष्ट्र » नितीशकुमारांना बिहारची अस्मिता टिकवायची की नाही?

नितीशकुमारांना बिहारची अस्मिता टिकवायची की नाही?

– नितेश राणे यांचा सवाल,
मुंबई, (११ मे) – बिहारचा सुपुत्र अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या खुनामध्ये ज्यांचे हात बरबटलेले आहेत, ज्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहे, अशा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटून तुम्ही घाणेरडे राजकारण करणार की बिहारची अस्मिता टिकवणार, असा सवाल भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी आज गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीशकुमारांना केला. याच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सुशांतसिंह राजपूत याच्या हत्येचा तपास करायला आलेल्या सीबीआयच्या अधिकार्यांना कोविडच्या नावाखाली विमानतळावर विलगीकरणात ठेवले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. गेले दोन-तीन दिवस ते सातत्याने टीका करीत आहेत. तुम्ही स्वतः मुन्नाभाई एलएलबी आहात. तुम्ही ज्या राहुल नार्वेकरांवर, त्यांच्या ज्ञानाबद्दल शंका व्यक्त करता त्याच राहुल नार्वेकरांकडून तुमच्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. तुमच्या मते जर राहुल नार्वेकरांना कायदा कळत नसेल तर आदित्य ठाकरेंनाही काही कळणार नाही, असे तुम्हाला म्हणायचे आहे का, असा सवालही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयातला निकाल आपल्या बाजूने लागला तर संविधानाचा विजय आहे; नाही तर संविधानाचा गळा घोटला जातोय, अशी आवई संजय राजाराम राऊत उठवतात. तुम्ही लोकशाहीला मानता, संविधानाला मानता मग तुमचे मालक १४ एप्रिलला संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला का जात नाहीत? मुख्यमंत्री असताना जावेच लागले. तो भाग सोडला तर किती वेळा हे चैत्यभूमीवर गेले हे राऊत यांनी सांगावे, असे ते म्हणाले.
लाचार माणसाने नैतिकतेबद्दल बोलू नये
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आपण समाधानी आहोत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जे बोलत होते तेच झाले. आता त्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे मुन्नाभाई एलएलबी गेले कुठे, असा सवाल नितेश राणे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी जाता जाता दिलेल्या शापामुळे उद्धव ठाकरे यांची ही अवस्था झाली आहे. त्यांनी धर्माशी बेईमानी केली. वडिलांच्या विचारांशी बेईमानी केली. आता त्यांच्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही आणि पदही नाही. बेरोजगार झालेले उद्धव ठाकरे या लाचार माणसाने आता नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत, असेही ते म्हणाले. त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, यांनाही कळलं असेल की आपण कोणत्या बालिश माणसाला आपल्यासोबत घेतले होते, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

Posted by : | on : 11 May 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g