किमान तापमान : 28.68° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 5.95 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.85°C - 29.92°C
sky is clear28.31°C - 29.9°C
sky is clear28.18°C - 29.79°C
sky is clear27.85°C - 29.19°C
sky is clear28.08°C - 29.61°C
few clouds28.1°C - 29.3°C
few cloudsपंढरपूर, (०६ जानेवारी) – काही झाले तरी आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही. अशी निर्धारी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात जाहीर केली.
शनिवारी पंढरपुरात ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी समाजातील महत्त्वाचे नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. हा पांडुंरग सर्वांचा आहे. मी मागील वेळी सर्व संतांची नावे वाचून दाखवली होती. या सर्व संतांचे म्हणणे एकच आहे. सर्व एकत्र येऊ. निवडणूक आली की सर्व पक्षांचे नेते पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातात. तेव्हा त्यांना अडवले जात नाही. मग आरक्षणाच्या वेळेसच का अडवले जाते, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. आमचा मराठा आरक्षणाला आणि मराठा समाजाला विरोध नाही. मात्र, आरक्षणाखाली जी झुंडशाही सुरू आहे, त्याला आमचा विरोध आहे, असे भुजबळ म्हणाले.
ती मावळ्यांची सेना होती
शिवरायांच्या नावावरून आम्हाला बोलले जाते, पण लक्षात ठेवा छत्रपतींची मराठा सेना नव्हती ती मावळसेना होती. छत्रपतींची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधून काढली. पहिली शिवजयंती फुलेंनी सुरू केली. पहिला पोवाडा फुलेंनी सुरू केला. शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता, अशी टीका भुजबळ यांनी केली.
गरिबी, श्रीमंतीवर आरक्षण नाही
कोणत्या मैदानावर उपोषण करायचे, ते पाहण्यासाठी यांची २०० पोरं गाड्या घेऊन मुंबईत गेली. आमची पोरं गरीब असल्याचे सतत म्हटले जाते, पण आरक्षण हे गरिबी आणि श्रीमंतीवर नाही. तुम्ही सामाजिकदृष्ट्या किती मागासलेले आहात, यावर अवलंबून आहे. मंत्रालयातही ५४ टक्के मराठा समाजाचे लोक आहे, असे म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट वार केला.
आकाश पाताळ एक करू
मला मंत्रिपदाची पर्वा नाही. मंत्रिमंडळातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर जे बोलायचे ते बोललो. त्यामुळे मतांकडे पाहून तुम्ही भाषणे देऊ नका. मतं आमच्याकडेही आहेत. आम्ही विकास करण्यासाठी आकाश पाताळ एक करू, असे भुजबळ यांनी सांगितले.