|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.57° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 66 %

वायू वेग : 5.64 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.44°C - 31.99°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.05°C - 30.62°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.88°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.59°C - 29.85°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.84°C - 30.49°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.29°C - 30.35°C

few clouds
Home » मुंबई-कोकण » रहस्यमय कार; गूढ मृत्यू

रहस्यमय कार; गूढ मृत्यू

कारमालक मनसुख हिरेन यांचे शव आढळल्याने संशय वाढला, प्रकरणाचा तपास एटीएस करणार,
मुंबई, ५ मार्च – रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर, आता या कारचा मालक मनसुख हिरेन यांचे शव मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडले आहे. हिरेन गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी आज दुपारी नौपाडा पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती. त्यांचा मृतदेह अशा प्रकारे आढळून आल्याने या प्रकरणातील संशय अधिकच वाढला. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला आहे.
गुरुवारी रात्रीपासून हिरेन आपल्या घरी आले नव्हते. आज रेतीबंदर खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आला. लगेच पोलिसांचे पथक तिथे पोहोचले आणि खाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तपास एनएआयकडे सोपवा : फडणवीस
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीच वाढले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सरकारने एनआयएकडे सोपवावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणाची चौकशी एटीएसकडे सोपविण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्यामुळे आम्ही ही मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले. या प्रकरणात बर्‍याच प्रमाणात योगायोग आहेत. जिलेटिन ठेवलेली कार घेऊन ठाण्यातले मनसुख हिरेन मुंबईला येत होते. स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे त्यांनी ती गाडी ऐरोली ब्रीजजवळ विक्रोळी येथे सर्व्हिस रोडवर ठेवली. तिथून ओला गाडीने ते क्रॉफर्ड मार्केटजवळ गेले. तिथे ते कुणाला तरी भेटले. ही व्यक्ती कोण, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
सचिन वाझे तिथे कसे पोहोचले?
दुसर्‍या दिवशी त्यांची गाडी सर्व्हिस रोडवर नव्हती. जेव्हा या गाडीचा पत्ता लागला आणि त्यात जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, तेव्हा तेथे सचिन वाझे नावाचे पोलिस अधिकारी होते. स्थानिक पोलिस किंवा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस पोहोचण्याआधी वाझे तेथे का गेले, त्यात आढळलेले पत्रही वाझे यांच्याच हाती लागले होते. सुरुवातीचे सात दिवस त्यांच्याकडे तपास होता. ज्या दिवशी या गाडीची चोरी झाली, त्या दिवशी तसेच त्याच्या आधी काही दिवस मनसुख यांच्या भ्रमणध्वनीवरून वाझे यांना फोन गेले होते. त्याआधीही अनेकदा वाझे आणि मनसुख यांचे बोलणे झाले होते. या दोघांमध्ये काय संबंध होते, असा सवाल त्यांनी केला.
माहितीच्या अधिकारात केला मुद्दा उपस्थित
मनसुख यांचा मृतदेह सापडल्याने फडणवीस यांनी माहितीच्या अधिकाराखाली हा विषय सभागृहात उपस्थित केला आणि या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याची आग्रही मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसुख यांचा मृतदेह ठाण्याच्या रेतीबंदर येथे सापडल्याची माहिती दिली व त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत असल्याचे सांगितले. त्यावर फडणवीस यांनी त्यांना पुन्हा घेरले. हात मागे बांधून कुणीही आत्महत्या करीत नाही. मनसुख यांचे हात मागे बांधलेले होते, असा दावा करत या प्रकरणाची एनआयएकडून चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, देशमुख यांनी महाराष्ट्र पोलिस सक्षम असल्याचे सांगत ही मागणी फेटाळली.
आशिष शेलारांनीही घेरले
ही चर्चा सुरू असतानाच माहितीच्या अधिकाराखाली आशिष शेलार यांनी, मनसुख यांचे शवविच्छेदन होत असताना तिथे सचिन वाझे उपस्थित का होते, असा सवाल केला. येथे पोलिसांचे कामच नाही. मग हा योगायोग कशाला, असा सवालही त्यांनी केला.

Posted by : | on : 5 Mar 2021
Filed under : मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g