|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:59 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.52° C

कमाल तापमान : 28.52° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 64 %

वायू वेग : 3.36 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.52° C

Weather Forecast for
Sunday, 05 May

27.65°C - 30.57°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.14°C - 31.11°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.47°C - 30.63°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.04°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.8°C - 30.07°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

28.08°C - 30.2°C

sky is clear
Home » महाराष्ट्र » ’यामुळे’ शरद पवार पंतप्रधान पदाला मुकले

’यामुळे’ शरद पवार पंतप्रधान पदाला मुकले

मुंबई, (१२ मे) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भविष्यात पंतप्रधान होऊ शकतात, असा दावा राज्याचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केला आहे. शरद पवारांसारखा माणूस होणे नाही. हा शेवटचा माणूस आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी परिस्थिती बदलली तर शरद पवार पंतप्रधानही होऊ शकतील, असा दावा केला आहे.
यशवंतराव गडाख म्हणाले, ईडीच्या भीतीने लोक आज सोडून चालले आहेत. पण त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की तुम्ही कुठेही जा, मी माझा पक्ष वाढवणार. याही वयात मी संपूर्ण महाराष्ट्र फिरणार. लोकांमध्ये जाणार. ज्यांना जायचं आहे, त्यांनी जावं. माझी कोणावर आडकाठी नाही. ही हिंमत ८२ व्या वर्षी आहे. असा माणूस होणे नाही. हा शेवटचा माणूस आहे. कुठेही काही नसताना आज दिल्लीत सर्वपक्षीय नेते त्यांना मानतात. काय सांगावं कदाचित होणार्‍या निवडणुकीनंतर जर परिस्थिती बदलली तर ते पंतप्रधानही होतील. कारण पंतप्रधानपदी असा माणूस मिळणं हे सध्या अवघड आहे.
गडाख पुढे बोलताना म्हणाले, शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, कारण दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडी कामाला लागायची आणि दिल्लीतून त्यांचं नाव कापण्यात यायचं. नरसिंह राव आणि शरद पवार यांच्यात पक्षांतर्गत निवडणूक झाली तेव्हा मी माझं मत पवारांना दिलं होतं. मात्र दिल्लीतील चौकडीमुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाही, असेही यशवंतराव गडाख यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे राजकीय नाट्य घडले. या पार्श्वभूमीवर यशवंतराव गडाख यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

Posted by : | on : 12 May 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g