किमान तापमान : 28.01° C
कमाल तापमान : 28.66° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 80 %
वायू वेग : 2.08 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.66° C
28.38°C - 29.79°C
sky is clear27.79°C - 29.73°C
sky is clear27.68°C - 29.18°C
sky is clear27.67°C - 29.77°C
sky is clear27.87°C - 29.15°C
sky is clear28.2°C - 29.53°C
overcast clouds– ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास,
मुंबई, (१९ मे) – १ जून १९४८ रोजी सुरू झालेल्या पुणे-अहमदनगर मार्गावरील राज्य परिवहन बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे बुधवारी रात्री मुंबईपासून २७५ किमी अंतरावर असलेल्या अहमदनगरमधील माळीवाडा भागातील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली.
१७ ऑगस्ट १९२४ रोजी लक्ष्मण केवटे यांचा जन्म झाला होता. जेव्हा एसटीने स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात पहिली बससेवा सुरू केली तेव्हा केवटे १ जून १९४८ च्या ऐतिहासिक दिवशी वाहक म्हणून एसटी सेवेत रुजू झाले होते. ३० एप्रिल १९८४ रोजी सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी ३६ वर्षे परिवहन महामंडळात काम केले, असे एमएसआरटीसीच्या अधिकार्याने सांगितले. निवृत्तीनंतरही त्यांनी अलीकडच्या काळापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या उपक‘मात सकि‘य सहभाग घेतला होता. २०२२ मध्ये महामंडळाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त, केवटे यांनी अहमदनगर ते पुणे या पहिल्या ई-शिवाई बसला हिरवा झेंडा दाखवला. वृद्धापकाळ असूनही त्यांनी राज्य परिवहन सेवांच्या ७५ वर्षांच्या माहितीपटासाठी मुलाखत दिली होती, असे अधिकार्याने सांगितले.
केवटे यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, एसटीचा प्रवास सुरू करणार्या केवटे यांचा जीवन प्रवास थांबला असला तरी, त्यांचे कार्य एसटीच्या इतिहासात कायम स्मरणात राहील. केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले. त्यांची असाधारण सेवा सर्व राज्य परिवहन कर्मचार्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनीही केवटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.