किमान तापमान : 28.91° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 3.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.32°C - 30.2°C
sky is clear27.94°C - 31.58°C
sky is clear28.2°C - 30.44°C
sky is clear27.88°C - 30.21°C
few clouds27.63°C - 29.87°C
sky is clear27.53°C - 29.77°C
sky is clearमुंबई, (१४ ऑगस्ट) – दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त तुरुंगांतून बंदिवानांची सुटका केली जाते. यंदाही १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी राज्याच्या विविध तुरुंगांतून बंदिवानांची सुटका करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह सचिवाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंदिवानांना तीन टप्प्यांमध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. माफीच्या तिसर्या टप्प्यानुसार, स्वातंत्र्यदिनी १८६ बंदिवानांना कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.
या आधी पहिल्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६, दुसर्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैद्यांची सुटका झाली होती आणि आता तिसर्या टप्प्यात १५ ऑगस्ट रोजी १८६ बंदिवानांची सुटका होत आहे. यंदा सुटका होणार्या बंदिवानांमध्ये विदर्भातील नागपूर मध्यवर्ती कारागृह (२३), अमरावती खुले कारागृह (५), अमरावती मध्यवर्ती कारागृह (१९), अकोला (६), भंडारा, वर्धा खुले, वाशीम, मोर्शी जि. अमरावती खुले येथील प्रत्येकी १, चंद्रपूर व वर्धा जिल्हा प्रत्येकी २, तसेच गडचिरोली कारागृहातील ४ बंदिवानांचा समावेश आहे.