किमान तापमान : 28.49° C
कमाल तापमान : 29.49° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 2.87 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.49° C
27.97°C - 30.03°C
sky is clear27.6°C - 30.31°C
sky is clear27.65°C - 29.86°C
sky is clear27.57°C - 29.91°C
sky is clear28.23°C - 29.99°C
scattered clouds28.08°C - 29.83°C
broken cloudsमुंबई, (२९ जुलै) – मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजना घोषित केल्यानंतर, निर्णय घोषित झाल्यानंतर अभिनंदन करणे तर सोडा, उलट गतीरोधक होऊन योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचू नये, असा प्रयत्न असल्याचा भाव ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. थोरातांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केले, त्याचा निषेधच सभागृहाने केला पाहिजे. अशा शब्दांत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार हल्ला चढवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्यांना भरपाई देण्यासंदर्भात निवेदन केले. यावर बोलण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्षांकडे संधी मागितली. मात्र, निवेदनावर बोलता येणार नाही म्हणून नियमाचा दाखला देत अध्यक्षांनी संधी नाकारली. तेव्हा थोरात यांनी माहितीच्या मुद्याद्वारे बोलण्याची संधी मागितली आणि निवेदनावरच बोलले. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांना थांबविले. यावेळी विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प‘यत्न असल्याचा आरोप अध्यक्षांवर करण्यात आला. मात्र, अध्यक्षांनी विधानसभा नियमांचा दाखला देत नियमबाह्य कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा विरोधकांना दिला.
यावर मुनगंटीवार यांनी आपले मत मांडताना, लाखो शेतकरी संकटात असताना, मु‘यमंत्री आपल्या सर्व सहकार्यांसमवेत इतक्या वेगाने शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घोषित करीत असताना, इतक्या कोत्या मनाने कोणीही वागता कामा नये. अशा शब्दांत थोरातांना फटकारले.
विरोधी पक्षनेता का नेमला नाही?
विधानसभा नियमावलीतील १८० पानावरील नियम ३२० मधील अधिकारानुसार मला सुद्ध माहिती विचारण्याचा अधिकार असून, या अधिकारान्वये विरोधकांनी सांगावे की, अधिवेशन संपायला आले तरी, अजूनपर्यंत विरोधी पक्षनेता का नेमला गेला नाही. स्वतः विरोधी पक्षनेता नेमण्याचा निर्णय घेऊ शकत नसलेले विरोधक सरकारच्या लोकहिताच्या निर्णयाला विरोध करतात, हे हास्यास्पद असल्याचे मुनगंटीवार संतप्तपणे म्हणाले.