|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.33° C

कमाल तापमान : 30.44° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 85 %

वायू वेग : 2.89 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.44° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home » महाराष्ट्र » शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे

शरद पवार गटाने फेटाळले अजित पवार गटाचे दावे

– निवडणूक आयोगाकडे दाखल केले उत्तर,
नवी दिल्ली, (०९ सप्टेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येदेखील आता पक्षाच्या चिन्हावरून आणि नावावरून न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे. अजित पवार यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी बंडखोरी करण्यात आल्यानंतर त्यांनी थेट पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ही अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यानंतर या प्रकरणी आक्रमक झालेल्या शरद पवार गटाकडून या प्रकरणी निवडणूक आयोगात दाद मागण्यात आली होती.
या प्रकरणी शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून मागील महिन्यात उत्तर देण्यास सांगितले होते. परंतु शरद पवार गटाकडून चार महिन्यांचा वेळ मागण्यात आला होता. मात्र त्यांना निवडणूक आयोगाकडून तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला. त्यानुसार आज ८ सप्टेंबरला उत्तर देण्याची वेळ संपणार होती. त्यामुळे शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्यावर उत्तर देण्यात आले आहे. जी-२० निमित्त आज नवी दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये बंद असल्याने निवडणूक आयोगाचे कार्यालयसुद्धा बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार यांनी केलेले दावे फेटाळत शरद पवार गटाने ई-मेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे उत्तर सादर केले आहे.
शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले दावे तर फेटाळण्यात आले आहेतच. परंतु, त्यासोबतच त्यांनी अजित पवार गटातील ९ मंत्री आणि ४० आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच, शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असा दावासुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तसेच, अजित पवार गटालादेखील या प्रकरणी आजच उत्तर दाखल करायचे आहे. परंतु, अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.
याबाबत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. शरद पवार गटाने कितीही दावे फेटाळले तरी त्याने कोणताही फरक पडत नाही. कारण, आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेताना सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास केला आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय असेल, ते पाहता निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे, असा दावा तटकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. परंतु, अद्याप या प्रकरणी निवडणूक आयोगाने पक्ष फुटीची केस अशी नोंद करून घेतलेली नाही. पण येणार्या काळात या प्रकरणाचा नेमका काय निकाल लागतोय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Posted by : | on : 9 Sep 2023
Filed under : महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g