किमान तापमान : 29.02° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 70 %
वायू वेग : 5.25 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.07°C - 31.6°C
sky is clear28.44°C - 30.65°C
sky is clear28.13°C - 30.46°C
sky is clear27.94°C - 30.17°C
sky is clear27.65°C - 29.86°C
sky is clear27.75°C - 29.93°C
sky is clearपुणे, (०४ सप्टेंबर) – राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. नव्या सत्रातील शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. यावर्षीपासून शिष्यवृत्तीच्या रकमेतही वाढ करण्यात आल्याचे वृत्त आहे.
राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून, ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून शिक्षण विभागाने अर्ज लवकर भरून घेण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जाते. १ ते १५ डिसेंबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज घेणार. तसेच २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अती विशेष विलंब शुल्कसह विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. ही शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग‘जी, तेलुगू, कन्नड या सात माध्यमांतून घेतली जाते. परीक्षेसाठी शिक्षण विभागाने वयोमर्यादा निश्चित केली आहे.