किमान तापमान : 30.07° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 1.81 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.13°C - 30.99°C
sky is clear28.81°C - 31.29°C
sky is clear28.62°C - 30.72°C
sky is clear28.55°C - 29.71°C
few clouds28.63°C - 29.55°C
broken clouds28.39°C - 29.39°C
overcast cloudsमुंबई, (०६ सप्टेंबर) – राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
आरोग्य भवन येथील सभागृहात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मु‘य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या पायाभूत सोयी-सुविधा कक्षाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, सहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर, सहसंचालक विजय कँदेवाड, अतिरिक्त संचालक नितीन अंबावडकर आदी उपस्थित होते.
डॉ. भारती पवार म्हणाल्या, ‘आयुष्मान भव’ मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान मेळावा, आयुष्मान सभा, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम व ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची अंगणवाडी आणि शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत खाजगी क्षेत्राचाही सहभाग घ्यावा.
भारताला क्षयरोगमुक्त बनवायचे आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्न व्हावेत. ज्या दिवशी भारत आंतरराष्ट्रीय उद्दिष्टापेक्षा पाच वर्षांपूर्वीच २०२५ मध्ये क्षयरोगमुक्त होईल तो दिवस आपणासाठी आनंदाचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी या कामाचा आढावा घेत असतात. आज जागतिक आरोग्य संघटना भारताच्या आरोग्य विषयक सुधारणांचे दाखले जगाला देत असते. हे सर्व ‘टीम वर्क’मुळे होत आहे. प्रत्येकाने क्षयरोगमुक्त भारतासाठी निक्षय मित्र मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहनही डॉ. भारती पवार यांनी केले.