किमान तापमान : 29.14° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.66 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
30.1°C - 32.95°C
sky is clear29.22°C - 32.92°C
few clouds28.74°C - 32.24°C
sky is clear28°C - 30.52°C
sky is clear27.57°C - 30.43°C
sky is clear27.44°C - 30.2°C
sky is clearनवी दिल्ली, (२२ डिसेंबर) – मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमधील चार जिल्ह्यांमध्ये ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शुक्रवारी दिली.
केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात तामिळनाडूसाठी दोन हप्त्यांमध्ये ९०० कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच जारी केला आहे, असे त्यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले. तामिळनाडूमध्ये जेव्हा एवढी मोठी आपत्ती घडत होती, तेव्हा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे इंडिया आघाडीसोबत दिल्लीत होते. प्रादेशिक हवामान केंद्र चेन्नईकडे तीन डॉपलरसह अत्याधुनिक उपकरणे असून, १२ डिसेंबरलाच हवामान केंद्राने टेंकासी, कन्याकुमारी, तिरुनेलवेली व तुतीकोरीन या चार जिल्ह्यांमध्ये १७ डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता.