किमान तापमान : 28.66° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.42 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
27.24°C - 30.06°C
sky is clear27.45°C - 30.54°C
sky is clear27.69°C - 30.8°C
sky is clear28.08°C - 31.07°C
sky is clear28.26°C - 30.62°C
few clouds27.88°C - 30.09°C
sky is clear– काही दिवसांतच पोहोचू शकू मंगळ ग्रहावर,
नवी दिल्ली, (३० डिसेंबर) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो सध्या अणुइंधनावर प्रक्षेपित होणार्या रॉकेटची निर्मिती करण्यावर काम करीत आहे. या रॉकेटचे प्रारंभित स्वरूपही समोर आले आहे. येत्या काही वर्षांतच हे रॉकेट तयार होणार असून, त्यानंतर लांब अंतरावरील कोणत्याही ग्रहावर पोहोचण्यासाठी भारताला केवळ काही दिवस लागणार आहेत. सध्या मंगळासारख्या लांबच्या ग्रहावर यान पाठविण्यासाठी इस्रोला एक ते दीड महिना लागतो.
न्यूक्लियर रॉकेट इंजिन विकसित करण्याचे फायदेही फार मोठे राहणार आहेत. चंद्र आणि मंगळ यासारख्या ग्रहांसाठी आयोजित मोहिमांमध्ये अंतराळवीरांना पुन्हा जमिनीवर आणण्यात कुठलीही अडचण जाणार नाही. इंधनाचीही काळजी राहणार नाही. अणुऊर्जेवर प्रक्षेपित होणारे रॉकेट आपल्या सूर्य मालिकेच्या बाहेरील सर्व मोहिमांकरिता उपयुक्त सिद्ध होतील. कारण, अशा लांबच्या अंतराळ मोहिमांसाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञान आवश्यक असते. भारताने अणुऊर्जेवर प्रक्षेपित होणार्या रॉकेटची निर्मिती केली तर, सूर्य मालिकेच्या बाहेरील मोहिमाही यशस्वीपणे पार पाडल्या जाऊ शकतील. इतकेच नव्हे तर, मंगळ ग्रहावर आपले अंतराळवीर पाठवून त्यांना परत आणणेही त्यामुळे शक्य होणार आहे.
रेडिओ थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर्सवरही काम
सूत्रांच्या हवाल्याने आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इस्रो आणि भाभा अणुसंशोधन केंद्र संयुक्तपणे रेडिओ थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर्सवरही काम करीत आहे. सध्या रॉकेट आणि उपग्रहांमध्ये रासायनिक इंधाचा वापर केला जात आहे. मात्र, भारताला एखाद्या ग्रहावरून परत यायचे असेल तर, रासायनिक इंजिन कमजोर ठरू शकते. कारण, यात फार जास्त प्रमाणात इंधन लागते.