किमान तापमान : 31.87° C
कमाल तापमान : 31.95° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 52 %
वायू वेग : 7.25 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.95° C
29.24°C - 32°C
sky is clear29.16°C - 32.18°C
sky is clear28.87°C - 31.24°C
sky is clear28.23°C - 29.74°C
sky is clear27.92°C - 29.64°C
sky is clear27.79°C - 29.44°C
sky is clear– पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,
अहमदाबाद, (१२ मार्च) – आमच्या सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी नव्हे, तर देशबांधणीच्या मिशनसाठी विकासकामे हाती घेतली आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. येथील डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर अहमदाबाद येथील साबरमती परिसरात देशातील १,०६,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला मोदी संबोधित करीत होते. यात दहा नवीन वंदे रेल्वेगाड्यांसह ८५ हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प, २०,६०० कोटी रुपयांच्या गुजरातच्या भरूच जिल्ह्याच्या दहेज येथील पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाचा समावेश आहे.
काही लोक आमच्या प्रयत्नांकडे निवडणुकीच्या नजरेतून पाहतात. देशबांधणीचा एक भाग म्हणून आम्ही विकासकामांची मोहीम सुरू केली आहे. यापूर्वीच्या पिढ्यांनी जे भोगले आहे, ते आपल्या तरुणांना भोगावे लागू नये, हे आम्ही सुनिश्चित करीत आहोत, असे मोदी यांनी सांगितले. यापूर्वी रेल्वेच्या विकासावर खर्च करण्यात आलेल्या निधीच्या दहापट निधी आम्ही खर्च केला आहे. २०२४ च्या दोन महिन्यांतच सरकारने ११ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा पायाभरणी केल्याची माहिती मोदी यांनी दिली.
वारसा न जपणार्या देशाचे भविष्य अंधकारमय
जो देश आपला वारसा जपत नाही, त्याचे भविष्य अंधकारमय असते, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. साबरमतीच्या गांधी आश्रम मेमोरियलयच्या १२०० कोटी रुपयांच्या मास्टरप्लॅनचे तसेच १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधी यांनी काढलेल्या प्रसिद्ध दांडी यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त नूतनीकरण करण्यात आलेल्या कोचरबा आश्रमाचे लोकार्पण करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मोदी संबोधित करीत होते.
जो देश आपला वारसा जपत नाही, त्याचे भविष्यही अंधकारमय असते. साबरमती आश्रम केवळ केवळ देशाचा नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचा वारसा आहे. साबरमती आश्रम हे केवळ स्वातंत्र्य चळवळीचेच नव्हे, तर विकसित भारताचेही तीर्थस्थळ आहे. साबरमतीसारख्या वारसास्थळांची देखभाल करण्याची मानसिकता किंवा राजकीय इच्छाशक्ती स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये नव्हती, असा आरोप मोदी यांनी केला.