किमान तापमान : 26.99° C
कमाल तापमान : 27.58° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.75 Mps
स्थळ : Mumbai, IN
26.99° C
26.99°C - 30.45°C
sky is clear27.3°C - 30.34°C
sky is clear27.48°C - 30.57°C
sky is clear28°C - 30.56°C
few clouds28°C - 30.08°C
sky is clear27.36°C - 29.66°C
few cloudsभुज, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक रविवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज येथील श्री कच्छी लेवा पटेल समाज, सरदार पटेल विद्या संकुल येथे या तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मातृश्री धनबाई प्रेमजी गांगजी भुडिया कम्युनिटी हॉल येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सभेची सुरुवात झाली.
संघाच्या रचनेनुसार देशभरातील ४५ प्रांत व ११ क्षेत्रांचे संघचालक, कार्यवाह, प्रचारक, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आणि काही विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटन मंत्री यांच्यासह सुमारे ३८२ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत. सुरुवातीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी सभेला उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. त्यानंतर देश आणि समाजासाठी विशेष योगदान देणा-या आणि नजीकच्या काळात निधन झालेल्या सर्व महनीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यात प्रामुख्याने रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी, मदनदास देवी, जयंत सहस्रबुद्धे, हरिभाऊ वझे आणि समाजजीवनातील विविध क्षेत्रातील नामवंत जसे ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक, प्रसिद्ध विचारवंत-लेखक तारिक फतेह, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक, माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, माजी सैनिक सेवा परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री व संस्थापक सदस्य कमांडर बालकृष्ण जयसवाल, उत्तराखंडच्या आंदोलक आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीला बलूनी, पद्मभूषण एन. विठ्ठल-खड यांच्यासह इतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मदत व सेवा कार्याची माहिती
काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, नागपूर येथे आलेला पूर आणि त्यामुळे बाधित झालेल्या समाजातील विविध लोकांसाठी स्वयंसेवकांनी केलेली मदत व सेवा कार्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
विस्तार योजनांचा आढावा घेणार
बैठकीत संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने कार्याच्या विस्तारासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यात येणार असून, संघ प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त निसर्गाच्या विरुद्ध जीवनशैली, वातावरणातील बदलांचा जगावर होणारा परिणाम, सुरक्षा, स्व-आधारित युगानुकूल नीती या सरसंघचालकांच्या विजयादशमीच्या उद्बोधनात नमूद केलेल्या विषयांवरही बैठकीत चर्चा केली जाईल. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, गोसेवा, ग्रामविकास व इतर उपक्रमांमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांचीही माहिती घेतली जाणार आहे. या सभेचा समारोप ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.