|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.29° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 74 %

वायू वेग : 6.64 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

29.44°C - 32.03°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.92°C - 31.92°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.75°C - 31.38°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.1°C - 29.72°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.91°C - 29.21°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.73°C - 29.38°C

sky is clear
Home »

जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे

जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे– श्री वासुदेव आश्रमात सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, वाशीम, (२१ नोव्हेंबर) – आपला भारत देश म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. जगाला धर्म देण्याचे काम भारताला करायचे आहे. सगळ्या जगातल्या लोकांना कसे जगावे हे त्यांना शिकविण्याची आपली जबाबदारी आहे. जगाला धर्म देण्यासाठी भारताला जगायचे आहे. आपापल्या संप्रदायाचे काम प्रत्येकाने सातत्याने केले पाहिजे, त्यासाठी समाजाचा व्यूह तयार व्हायला पाहिजे, लोकहितातून देशहित साधायचे आहे, अशाने भारत हा पुन्हा एकदा विश्वगुरूपदी आरूढ झालेला लवकरच...21 Nov 2023 / No Comment /

निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काही कमी पडू देत नाही

निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काही कमी पडू देत नाही– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, -स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचा सुवर्ण महोत्सव, नागपूर, (१८ नोव्हेंबर) – प्रामाणिकतेने, निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काहीच कमी पडू देत नाही. हात सैल सोडतो. त्यासाठी संवेदना हवी. उत्तम सेवेसाठी संवेदनेसह आपलेपणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज खापरी येथे केले. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन व खापरी येथील...18 Nov 2023 / No Comment /

रंगा हरीजी म्हणजे संघाच्या वैचारिक जडणघडणीचा आधारस्तंभ

रंगा हरीजी म्हणजे संघाच्या वैचारिक जडणघडणीचा आधारस्तंभ– प्रज्ञा प्रवाहचे अ. भा. संयोजक नंदकुमार यांची आदरांजली, मुंबई, (१८ नोव्हेंबर) – रंगा हरीजी म्हणजे संघाच्या वैचारिक जडणघडणीचा आधारस्तंभ होते. संघ स्वयंसेवकांसाठी ते एक तीर्थरूपी व्यक्तिमत्त्व होते. रंगा हरीजी हे केशववृक्षाला लागलेले अत्यंत सुंदर सुवासिक, सुमधुर पुष्प होते. ते उमलले, फुलले, आपला रसगंध सर्वांना देऊन निसर्गनियमाने गळून पडले, असे म्हणत प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक नंदकुमार यांनी रंगा हरीजी यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ज्याप्रमाणे पावसात छत्री घेऊन जरी चाललं...18 Nov 2023 / No Comment /

रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक सुरू

रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक सुरूभुज, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक रविवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज येथील श्री कच्छी लेवा पटेल समाज, सरदार पटेल विद्या संकुल येथे या तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मातृश्री धनबाई प्रेमजी गांगजी भुडिया कम्युनिटी हॉल येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सभेची सुरुवात झाली....6 Nov 2023 / No Comment /

संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन अराजकीय असावा: क्षेत्र प्रचारप्रमुख बापट

संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन अराजकीय असावा: क्षेत्र प्रचारप्रमुख बापटवर्धा, (२९ ऑक्टोबर) – दोन वर्षानंतर संघाची शताब्दी साजरी होणार आहे. संघाची स्थापना झाली नाही. कार्य सुरू झाले. ते काम गतिविधींच्या माध्यमातून शताब्दी वर्षात वाढवण्यात येईल. माध्यमं आणि संघाची अभिन्न मैत्री आहे. संघात काय चाललय याचे माध्यमांना कुतूहल असतं. संघाचे काम वाढत असताना माध्यमंही बहूस्पर्शी होऊ लागले आहे. माध्यमांचा राजकारणातच नाही तर विविध विषयात रस असतो. त्या माध्यमांतून चांगले विषय समाजापर्यंत पोहोचतात असतात. मात्र, संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन अराजकीय असावा असे...29 Oct 2023 / No Comment /

संघाच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांवर होणार चर्चा

संघाच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांवर होणार चर्चा-सामाजिक परिवर्तनासाठीच्या प्रयत्नांवर दिला जाणार भर, -सुनील आंबेकर यांनी दिली माहिती, पुणे, (१४ सप्टेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पुणे येथे होत असून, या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज बुधवारी येथे...14 Sep 2023 / No Comment /

अहंकार असल्यास ती सेवा ठरत नसते!: डॉ. मोहनजी भागवत

अहंकार असल्यास ती सेवा ठरत नसते!: डॉ. मोहनजी भागवत– स्नेहांचलच्या कार्याचे केले कौतुक, नागपूर, (०७ सप्टेंबर) – सेवा करताना कुणाच्याही मनात अहंकार येऊ नये. कारण ज्याची सेवा करतो, त्यांचे केवळ कल्याण करण्याचा हा प्रयास नसून सेवा करत असताना आपणही पवित्र होऊन जातो. म्हणूनच जेव्हा केव्हा अहंकार येतो, तेव्हा ती सेवा ठरत नसते. ती दया होते. आपण दया देत नाही तर सेवा करतो. अगदी अशीच पवित्र भावना जपत मरणप्राय यातना भोगणार्या कर्करुग्णांसाठी स्नेहांचलचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे, ही नक्कीच...7 Sep 2023 / No Comment /

दत्ताजींचे वैचारिक अधिष्ठान जीवनात झळकावे

दत्ताजींचे वैचारिक अधिष्ठान जीवनात झळकावे-सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे विचार, -दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी, नागपूर, (०६ ऑगस्ट) – दत्ताजी डिडोळकर, यशवंत केळकर आदींसह अनेकांनी राष्ट्रासाठी जीवनभर कार्य केले. त्यांचे वैचारिक अधिष्ठान आपल्या दैनंदिन जीवनात झळकायला हवे; तरच दत्ताजींच्या जन्मशताब्दीचे सार्थक होईल, असे विचार रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज व्यक्त केले. रा. स्व. संघाचे प्रचारक, अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या स्थापना काळातील अग्रणी कार्यकर्ते व कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाच्या प्रमुख रचयितांपैकी एक दत्ताजी डिडोळकर...6 Aug 2023 / No Comment /

मदनदास देवी यांचे निधन

मदनदास देवी यांचे निधन-मूळ गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बंगळुरू, (२५ जुलै) – अनेक पिढ्या घडविलेले मदनदास यांचा आज बेंगळुरू येथे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविपचे जेष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आज पहाटे सुमारे 5 वाजता बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे इथे अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संघ परिवार आणि समाजमन शोकमग्न आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनी म्हणजेच ९ जुलै रोजी मदनदास...25 Jul 2023 / No Comment /

वर्षभरात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे संघाचे लक्ष्य

वर्षभरात एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे संघाचे लक्ष्य– डॉ. मनमोहन वैद्य यांचे प्रतिपादन, – कोरोनाच्या काळात देशात वाढले संघकार्य, – पत्रपरिषदेत माहिती देताना सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य. सोबत अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, – अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या उद्घाटनप्रसंगी भारतमाता पूजन करताना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, पानिपत, (१२ मार्च) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारतमातेच्या छायाचित्राला पुष्प अर्पण केल्यानंतर समालखा येथील पट्टीकल्याणास्थित सेवा साधना...12 Mar 2023 / No Comment /

पानिपतच्या ऐतिहासिक भूमीवर संघाच्या शताब्दी वर्षाची योजना आखली जाणार

पानिपतच्या ऐतिहासिक भूमीवर संघाच्या शताब्दी वर्षाची योजना आखली जाणार– १२ ते १४ मार्चला पानिपत येथे संघाची अ. भा. प्रतिनिधी सभा, पानिपत, (१० मार्च) – अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघाची सर्वांत महत्त्वपूर्ण सभा आहे. या बैठकीत मागील वर्षातील कामांचा आढावा घेऊन आगामी वर्षात संघामार्फत करावयाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येत असतो. यावर्षी ही प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्चदरम्यान पानिपत जिल्ह्यातील समालखा येथील पट्टीकल्याणाच्या सेवा साधना आणि ग्राम विकास केंद्रात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल...11 Mar 2023 / No Comment /

समंजसता असती तर पारतंत्र्य आले नसते!: सरसंघचालक डॉ. भागवत

समंजसता असती तर पारतंत्र्य आले नसते!: सरसंघचालक डॉ. भागवतनागपूर, (१५ फेब्रुवारी ) – राजे रघुजी भोसलेंसारखा समंजसपणा सदासर्वदा आपल्यात असता तर हा देश पारतंत्र्यात कधीच गेला नसता, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट यांच्या वतीने राजरत्न पुरस्कार वितरण महालमधील मोठ्या राजवाड्यात झाले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम) व श्रीमंत राजे मुधोजी...15 Feb 2023 / No Comment /