किमान तापमान : 30.86° C
कमाल तापमान : 30.95° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.95° C
30.1°C - 32.95°C
sky is clear29.22°C - 32.92°C
few clouds28.74°C - 32.24°C
sky is clear28°C - 30.52°C
sky is clear27.57°C - 30.43°C
sky is clear27.44°C - 30.2°C
sky is clear– प्रज्ञा प्रवाहचे अ. भा. संयोजक नंदकुमार यांची आदरांजली,
मुंबई, (१८ नोव्हेंबर) – रंगा हरीजी म्हणजे संघाच्या वैचारिक जडणघडणीचा आधारस्तंभ होते. संघ स्वयंसेवकांसाठी ते एक तीर्थरूपी व्यक्तिमत्त्व होते. रंगा हरीजी हे केशववृक्षाला लागलेले अत्यंत सुंदर सुवासिक, सुमधुर पुष्प होते. ते उमलले, फुलले, आपला रसगंध सर्वांना देऊन निसर्गनियमाने गळून पडले, असे म्हणत प्रज्ञा प्रवाहचे अखिल भारतीय संयोजक नंदकुमार यांनी रंगा हरीजी यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
ज्याप्रमाणे पावसात छत्री घेऊन जरी चाललं तरी थोडं भिजणं होतंच, त्याप्रमाणे रंगा हरीजींच्या सान्निध्यात येणारे त्यांच्या विचारांमध्ये थोडं का होईना भिजून जायचे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी यांचे २९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत यशवंत भवन येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. नंदकुमार म्हणाले की, रंगा हरीजी यांचे वेळेचे नियोजन अत्यंत चोख असायचे. फोटोग्राफिक स्वरूपाची त्यांची स्मरणशक्ती होती. एखाद्या संघ स्वयंसेवकाला कसे घडवायचे याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. शेवटची घटका मोजत असतानाही त्यांनी विजयादशमीचे सरसंघचालकांचे बौद्धिक न चुकता ऐकले. यावरून त्यांच्या कणाकणात संघ स्वयंसेवक रुजला होता, हे दिसून आले.
आपल्या मृत्यूनंतर आपल्यावर होणारे अंत्यसंस्कार हे केरळमधील भारत नदीजवळ असलेल्या स्मशानभूमीतच व्हावे आणि अस्थींचे विसर्जनही भारत नदीतच करण्यात यावे, अशी रंगा हरीजींची इच्छा होती. याबाबत रंगा हरीजींनी आपल्या मृत्यूपूर्वी एका पत्रात लिहिल्याचे नंदकुमार यांनी सांगितले. संघात कुठलीही व्यक्ती सापेक्ष नाही. त्यामुळे रंगा हरीजींनी दिलेल्या विचारांवर प्रत्येकाने चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे म्हणत रंगा हरीजी लिखित एका प्रार्थनेचा भावार्थ सांगत नंदकुमार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.