किमान तापमान : 31.26° C
कमाल तापमान : 33.08° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 5.74 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.08° C
28.39°C - 33.99°C
sky is clear29.11°C - 33.06°C
sky is clear28.93°C - 32.79°C
sky is clear28.79°C - 32.44°C
sky is clear28.01°C - 30.67°C
sky is clear27.53°C - 29.98°C
sky is clear– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
-स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचा सुवर्ण महोत्सव,
नागपूर, (१८ नोव्हेंबर) – प्रामाणिकतेने, निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काहीच कमी पडू देत नाही. हात सैल सोडतो. त्यासाठी संवेदना हवी. उत्तम सेवेसाठी संवेदनेसह आपलेपणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज खापरी येथे केले. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन व खापरी येथील रुग्णालय परिसरातील नव्या हार्ट सेंटरचे लोकार्पण शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. व्यासपीठावर डॉ. मोहनजींसह मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता व उपाध्यक्ष पराग सराफ उपस्थित होते.
डॉ. दिलीप गुप्ता यांनी प्रास्ताविकात रुग्णालयाच्या स्थापनेपासून ते आजवरचा संस्थेचा प्रवास, नागरिक व संस्थांनी केलेली आर्थिक मदत, डॉ. नाना साल्पेकर यांच्यापासून ते डॉ. प्रशांत ओंकार, डॉ. अमर आमले, डॉ. संदीप खानझोडे आदींसह अनेक डॉक्टरांनी दिलेल्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
हाच धागा पकडून डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, प्रामाणिकतेने, निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काहीच कमी पडू देत नाही. हात सैल सोडतो. रुग्णालय उभे केल्यानंतर काम संपत नाही. सेवा कार्य सुरू राहायला हवे. अशा संस्थांना उत्तम कार्य केल्यानंतर नावलौकिक मिळतो. हा नावलौकिक कायम राहण्यासाठी उत्तम काम करावे लागते. त्यासाठी संवेदना हवी. त्यासाठी उपकरणे, साहित्य हवे. पण, आपलेपणा अर्थात ‘शिव भावे जीव सेवा’ हा भाव नसेल तर काहीच होणार नाही. काही रुग्णालये व्यावसायिक असतात. तेथे गरिबांच्या सावलीलाही प्रवेश नसतो. समाजाची गरज मोठी आहे. शिक्षण, रोजगार व औषधोपचार यासुद्धा आता मूलभूत गरजा झाल्या आहेत. हे स्वस्त व सुलभ रीत्या मिळायला हवे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा सेवा करणारा कार्याशी समरस होईल.
काळानुरूप विचार मागे पडायला नकोत. गुणवत्तेत कणभरही कमतरता यायला नको, हे मोहनजींनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता शेलगावकर, आभारप्रदर्शन सचिव नितीन पाटील यांनी केले. निधी रानडे हिच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पूर्वी डॉ. मोहनजी भागवत व देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयाची पाहणी केली. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, अ. भा. सहकार्यवाहिका चित्राताई जोशी, रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, खा. कृपाल तुमाने, प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी, डॉ. आनंद जयस्वाल, डॉ. उदय बोधनकर, अॅड. आनंद परचुरे, माहिती आयुक्त राहुल पांडे, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीना देशमुख, प्रख्यात सर्जन डॉ. यशवंत देशपांडे, संस्कृत भारतीचे रमेश मंत्री, जयप्रकाश गुप्ता, एकल विद्यालयाचे अरुण लखानी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नि:स्वार्थ भावनेतूनच गोरगरिबांची आरोग्य सेवा शक्य : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नि:स्वार्थ भावनेतून आरोग्य सेवा देणार्या डॉक्टरांमुळे आज समाजातील गोरगरीब जनतेला चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे. येथे आगामी काळात २५० बेड्सचे रुग्णालय होणार आहे. यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य राहणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनद्वारे गत ५० वर्षांपासून गोरगरीब जनतेची सेवा केली जात आहे. अनेक समस्यांचा सामना करीत संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली आहे. बाल स्वयंसेवक असतानापासून येथील आरोग्य सेवेचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यावेळी सुविधा नव्हत्या. मात्र बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणेतून आरोग्य सेवेचे सुरू झालेले कार्य अव्याहतपणे आजही सुरू आहे. येथील रुग्णसेवेचे कार्य इतर संस्थांसाठी प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.