|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.46° C

कमाल तापमान : 27.67° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 60 %

वायू वेग : 2.76 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.67° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.5°C - 30.59°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.68°C - 30.66°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.95°C - 30.89°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.22°C - 30.48°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.91°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.65°C - 29.6°C

few clouds
Home » मुंबई-कोकण » मानहानी प्रकरणात कंगनाला दिलासा नाहीच

मानहानी प्रकरणात कंगनाला दिलासा नाहीच

जावेद अख्तर यांच्या विरोधातील याचिका फेटाळली,
मुंबई, ९ सप्टेंबर – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत विरोधात सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून कंगनाला कोणताही दिलासा मिळालेला नाही. कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगनाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
गीतकार जावेज अख्तर यांनी कंगना विरोधात उच्च न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने दाखल केली होती. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीची दखल घेऊन महानगरदंडाधिकार्‍यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करावी, या मागणीसाठी अभिनेत्री कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तातडीचा दिलासा म्हणून महानगर दंडाधिकार्‍यांनी सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही कंगनाने केली होती. या याचिकेवर १ सप्टेंबरला सुनावणी पार पडली.
त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने या प्रकरणावर निकाल घोषित केला आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. वकील रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाची बाजू मांडली. वकील जय के. भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांच्या बाजूने युक्तिवाद केला. दोन्ही वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायलयाने निकाल जाहीर केला. यात कंगनाला कोणाताही दिलासा मिळालेला नाही.
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत एका बॉलीवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली. यावरून जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून, प्रचंड मनस्ताप झाला, असा आरोप करीत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने १ मार्च रोजी कंगनाला वॉरंट जारी केला होता. मात्र, हा खटला अजूनही प्रलंबित आहे.

Posted by : | on : 9 Sep 2021
Filed under : मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g