किमान तापमान : 28.66° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 2.42 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.24°C - 30.08°C
sky is clear27.45°C - 30.54°C
sky is clear27.69°C - 30.8°C
sky is clear28.08°C - 31.07°C
sky is clear28.26°C - 30.62°C
few clouds27.88°C - 30.09°C
sky is clearअनेक घरांवर भिंती व दरडी कोसळल्या, सर्वत्र हाहाकार, चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये पाऊस ठरला काळ,
मुंबई, १८ जुलै – मुंबई आणि आसपासच्या परिसरात शनिवारी रात्रभर मुसळधार पावसाने थैमान घातले. चेंबूर, विक्रोळी आणि भांडुपमध्ये पावसामुळे दरड पडल्याने घरे कोसळली. यात २९ जणांचा मृत्यू झाला. चेंबूरमध्ये २१ जणांचा, विक्रोळीत झोपडपट्टीवर दरड कोसळून सात जणांचा आणि भांडुपमध्ये भिंत कोसळून १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.
चेंबूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच बाजूच्या घरांवर कोसळली. यात २१ जणांचा मृत्यू झाला. एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळपर्यंत १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, अशी माहिती एनडीआरएफच्या सूत्रांनी दिली.
विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली
विक्रोळीत दुमजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. पंचशीलनगर भागात ही दुर्घटना घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. या भागातही एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य हाती घेतले होते. पंचशीलनगर भागात पाच ते सहा घरांवर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. पाच ते सहा जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा
मुंबईतील तिन्ही घटनांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनांमधील मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची व जखमींना ५० हजार रुपयांची घोषणा केली. पंतप्रधान मदत निधीतून ही मदत दिली जाणार असल्याचे ट्विट पंतप्रधानांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनांवर दु:ख व्यक्त केले आहे. चेंबूरमधील घटना अतिशय विदारक असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी पाच लाख
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असे जाहीर केले. मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने, कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांमध्ये पाणी वाढल्यास आसपासच्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर केले जावे, असेही त्यांनी सांगितले.