|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.97° C

कमाल तापमान : 30.18° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 55 %

वायू वेग : 4.03 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.97° C

Weather Forecast for
Saturday, 04 May

27.58°C - 30.2°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.7°C - 30.89°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.18°C - 31.32°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.41°C - 30.74°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.99°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.74°C - 29.94°C

sky is clear
Home » मुंबई-कोकण » शिवसेनेच्या मुळावर उठलेले परब निष्ठावंत कसे?

शिवसेनेच्या मुळावर उठलेले परब निष्ठावंत कसे?

रामदास कदमांचा सवाल, शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर,
मुंबई, १८ डिसेंबर – शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब हे निष्ठावंत कसे, असा सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज येथे पत्रपरिषदेत केला आहे. अनिल परब यांनी मनसे आणि राकॉंच्या पदाधिकार्‍यांना हाताशी धरून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी खूप प्रयत्न केले. राकॉंचे संजय कदम यांना ते मातोश्रीवर घेऊन गेले, पण उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाही. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत होता म्हणून तो पाडला गेला. काही कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांच्या मागे कोण होते, हे मला माहीत होते. मी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो, मी कधीच किरीट सोमय्या यांच्याशी बोललो नाही. मी कधीही पक्षाच्या विरोधात काम केले नाही, असे कदम यांनी सांगितले.
तीन-चार महिन्यांपासून माझ्या संदर्भात प्रसारमाध्यमांत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. माझी भूमिका सर्वांना माहीत व्हावी म्हणून माझी बाजू मांडत आहे. मला उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब यांनी जिल्हा वार्‍यावर सोडला. पालकमंत्री म्हणून त्यांचा संपर्क नाही. अनिल परबांनी मुंबईतून निवडून येऊन दाखवावे, असे रामदास कदम म्हणाले.
उद्धव ठाकरेंना पाठवले पत्र
रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करीत, उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. उद्धवजी, पुन्हा आपल्याला हात सोडून सांगतो की, आम्हाला बाजूला ठेवून ज्यांना विश्‍वासाने मंत्रिपद दिले, ते कुणाची घरे फोडणे, इतर पक्षांच्या पुढार्‍यांना हाताशी धरून पक्ष संपवणे, अशी कामे करीत आहेत. कृपा करून त्यांना थांबायला सांगा, असे कदम यांनी पत्रात म्हटले आहे. परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टच्या उद्घाटनासाठी राकॉंचा माजी आमदार व मनसेचा नगराध्यक्ष कसा जातो? त्याच्या छायाचित्रासह पुरावे देईन, असेही पत्रात म्हटले आहे.
मी काही बोलणार नाही ः परब
रामदास कदम यांच्या आरोपाबाबत विचारले असता, परब म्हणाले की, मी यावर काही बोलणार नाही. माझ्यावर कुणाला वाटेल ते आरोप करू द्या. मी एक शिवसैनिक आहे. माझ्यावरील आरोपांबाबत जी काही दखल घ्यायची, ती पक्षच घेईल.

Posted by : | on : 18 Dec 2021
Filed under : मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g