किमान तापमान : 28.74° C
कमाल तापमान : 29.57° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 3.18 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.57° C
27.32°C - 30.25°C
sky is clear27.94°C - 31.58°C
sky is clear28.2°C - 30.44°C
sky is clear27.88°C - 30.21°C
few clouds27.63°C - 29.87°C
sky is clear27.53°C - 29.77°C
sky is clear– पंतप्रधान मोदींनी घेतली एनसीसी आणि एनएसएस स्वयंसेवकांची भेट,
नवी दिल्ली, (२४ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी ’जनरेशन झेड’ला ’अमृत पिढी’ असे संबोधले आणि सांगितले की, भारताची ’अमृत पिढी’ अमृत काळातील देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल. ’नेशन फर्स्ट’ हे तुमचे मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे, असे ते म्हणाले. ’जनरेशन झेड’ मध्ये १९९६ ते २०१० दरम्यान जन्मलेल्या तरुणांचा समावेश आहे.
पंतप्रधान आपल्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांना संबोधित करत होते. मोदींनी तरुणांना जीवनातील शिस्तीचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांना प्रेरणाचा मंत्र बनवण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान म्हणाले की, तुमच्या पिढीला तुमच्याच शब्दात ’जनरेशन झेड’ म्हणतात. पण, मी तुम्हाला ’अमृत जनरेशन’ मानतो. तुम्ही असे लोक आहात ज्यांची ऊर्जा अमृत कालमध्ये देशाला गती देईल. राष्ट्र प्रथम तुमचे मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे. आयुष्यात कधीही अपयशाने खचून जाऊ नका.
पंतप्रधान म्हणाले की, तुम्हा सर्वांना माहिती आहे की, भारताने २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प केला आहे. पुढील २५ वर्षे तुमच्यासाठी आणि देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. तुमच्या अमृत पिढीचे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे हा आमचा संकल्प आहे. तुमच्या अमृत पिढीसाठी भरपूर संधी मिळाव्यात हा आमचा संकल्प आहे. तुमच्या अमृत पिढीच्या मार्गातील प्रत्येक अडथळे दूर व्हावेत हा आमचा संकल्प आहे.
ते म्हणाले की, तुम्ही (एनसीसी आणि एनएसएस कॅडेट्स) प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा भाग असणार आहात. यावेळी तो दोन कारणांमुळे अधिक खास झाला आहे. प्रथम, हा ७५ वा प्रजासत्ताक दिन आहे आणि दुसरे म्हणजे, पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाची परेड देशाच्या स्त्री शक्तीला समर्पित आहे. मोदी म्हणाले की, आज ’राष्ट्रीय बालिका दिन’ आहे, आजचा दिवस मुलींच्या धैर्याची, भावनेची आणि कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा दिवस आहे. समाज आणि देश सुधारण्याची क्षमता मुलींमध्ये असते. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या मुलींनी त्यांच्या दृढ हेतूने आणि समर्पणाच्या भावनेने अनेक मोठ्या बदलांचा पाया रचला आहे.