|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:16 | सूर्यास्त : 18:21
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.18° C

कमाल तापमान : 28.55° C

तापमान विवरण : light rain

आद्रता : 73 %

वायू वेग : 2.64 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.18° C

Weather Forecast for
Sunday, 22 Sep

27.5°C - 29.06°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 23 Sep

27.52°C - 28.91°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 24 Sep

27.37°C - 28.79°C

moderate rain
Weather Forecast for
Wednesday, 25 Sep

27.18°C - 28.59°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 26 Sep

26.27°C - 28.48°C

light rain
Weather Forecast for
Friday, 27 Sep

24.46°C - 25.98°C

moderate rain
Home » राष्ट्रीय, संसद » मणिपूर हिंसाचार चर्चेवरून विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ

मणिपूर हिंसाचार चर्चेवरून विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली, (०१ ऑगस्ट) – मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर नियम १७६ नुसार चर्चा करण्याची सत्ताधारी सदस्यांनी केलेली मागणी अध्यक्ष जगदीप धनकड यांनी मान्य केल्यानंतर राज्यसभेत गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अनेकवेळा स्थगित करावे लागले. दुपारी २ वाजता भोजनावकाशानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच धनकड यांनी मणिपूरच्या मुद्यावर नियम १७६ नुसार चर्चा करण्याबाबतचा सत्ताधारी पक्षाकडून आलेला प्रस्ताव मान्य करीत असल्याचे जाहीर केले. त्यावर आम्ही दिलेल्या प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा विरोधी सदस्यांनी केली. मणिपूरच्या मुद्यावर नियम २६७ नुसार चर्चेची मागणी करणारा प्रस्ताव प्रस्ताव आम्ही दिला होता, असे सदस्य म्हणत होते. त्यावर तुमचा हा प्रस्ताव मी शुक‘वारीच फेटाळला होता, आता माझ्या कार्यालयाकडे तुमचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाही, असे धनकड यांनी स्पष्ट केले आणि नियम १७६ नुसार चर्चाही पुकारली.
यामुळे संतापलेल्या विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केली. प्रत्युत्तरात भाजपाचे सदस्यही मणिपूर मणिपूर अशा घोषणा देऊ लागले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभापती धनकड यांनी कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित केले. दुपारी अडीच वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा गोंधळाची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे धनकड यांनी कामकाज दुपारी साडेतीनपर्यंत आणि त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने दिवसभरासाठी स्थगित केले.
लोकसभेतही गोंधळ, कामकाज स्थगित
मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन निवेदन करावे, या मागणीचा पुनरुच्चार करीत, लोकसभेत आज विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.
आज सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मणिपूरच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येत घोषणाबाजी केली. गोंधळातच सदस्य प्रश्न विचारत होते व मंत्री उत्तर देत होते. सदस्यांनी शांत राहावे, आपल्या जागेवर जावे, प्रश्नोत्तराचा तास चालू द्यावा, असे आवाहन बिर्ला करीत होते, पण त्याला विरोधी सदस्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. गोंधळ थांबत नसल्यामुळे बिर्ला यांनी कामकाज स्थगित केले. पावसाळी अधिवेशनातील संसदेच्या कामकाजाचा आजचा तिसरा आठवडा होता. मात्र गोंधळामुळे आतापर्यंत प्रश्नोत्तराच्या तसेच शून्य तासाचे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.

Posted by : | on : 1 Aug 2023
Filed under : राष्ट्रीय, संसद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g