किमान तापमान : 28.18° C
कमाल तापमान : 28.55° C
तापमान विवरण : light rain
आद्रता : 73 %
वायू वेग : 2.64 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.18° C
27.5°C - 29.06°C
scattered clouds27.52°C - 28.91°C
light rain27.37°C - 28.79°C
moderate rain27.18°C - 28.59°C
moderate rain26.27°C - 28.48°C
light rain24.46°C - 25.98°C
moderate rainनवी दिल्ली, (०१ ऑगस्ट) – मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर नियम १७६ नुसार चर्चा करण्याची सत्ताधारी सदस्यांनी केलेली मागणी अध्यक्ष जगदीप धनकड यांनी मान्य केल्यानंतर राज्यसभेत गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज अनेकवेळा स्थगित करावे लागले. दुपारी २ वाजता भोजनावकाशानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच धनकड यांनी मणिपूरच्या मुद्यावर नियम १७६ नुसार चर्चा करण्याबाबतचा सत्ताधारी पक्षाकडून आलेला प्रस्ताव मान्य करीत असल्याचे जाहीर केले. त्यावर आम्ही दिलेल्या प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा विरोधी सदस्यांनी केली. मणिपूरच्या मुद्यावर नियम २६७ नुसार चर्चेची मागणी करणारा प्रस्ताव प्रस्ताव आम्ही दिला होता, असे सदस्य म्हणत होते. त्यावर तुमचा हा प्रस्ताव मी शुक‘वारीच फेटाळला होता, आता माझ्या कार्यालयाकडे तुमचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नाही, असे धनकड यांनी स्पष्ट केले आणि नियम १७६ नुसार चर्चाही पुकारली.
यामुळे संतापलेल्या विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी केली. प्रत्युत्तरात भाजपाचे सदस्यही मणिपूर मणिपूर अशा घोषणा देऊ लागले. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभापती धनकड यांनी कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत स्थगित केले. दुपारी अडीच वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा गोंधळाची पुनरावृत्ती झाली. त्यामुळे धनकड यांनी कामकाज दुपारी साडेतीनपर्यंत आणि त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने दिवसभरासाठी स्थगित केले.
लोकसभेतही गोंधळ, कामकाज स्थगित
मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन निवेदन करावे, या मागणीचा पुनरुच्चार करीत, लोकसभेत आज विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.
आज सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मणिपूरच्या मुद्यावर पंतप्रधान मोदी यांच्या निवेदनाची मागणी करीत विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येत घोषणाबाजी केली. गोंधळातच सदस्य प्रश्न विचारत होते व मंत्री उत्तर देत होते. सदस्यांनी शांत राहावे, आपल्या जागेवर जावे, प्रश्नोत्तराचा तास चालू द्यावा, असे आवाहन बिर्ला करीत होते, पण त्याला विरोधी सदस्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. गोंधळ थांबत नसल्यामुळे बिर्ला यांनी कामकाज स्थगित केले. पावसाळी अधिवेशनातील संसदेच्या कामकाजाचा आजचा तिसरा आठवडा होता. मात्र गोंधळामुळे आतापर्यंत प्रश्नोत्तराच्या तसेच शून्य तासाचे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.