किमान तापमान : 27.77° C
कमाल तापमान : 27.77° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.43 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.77° C
27.48°C - 30.59°C
sky is clear27.68°C - 30.66°C
sky is clear27.95°C - 30.89°C
sky is clear28.22°C - 30.48°C
few clouds27.91°C - 30.08°C
sky is clear27.65°C - 29.6°C
few clouds– अंतरिम अर्थसंकल्पातून मदतीत मोठी कपात,
नवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – मालदीवच्या सुख-दुःखात भागीदार असलेला भारत त्याच्या कारवायांवर इतका नाराज झाला आहे की, आता केंद्र सरकारने मालेला देण्यात येणार्या आर्थिक मदतीत मोठी कपात केली आहे. सरकारने गुरुवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालदीवच्या मदतीत २२ टक्के कपात करण्याचा प्रस्ताव आहे. भारत शेजारी देश मालदीवला त्याच्या गरजांसाठी आर्थिक मदत करीत असतो.
मालदीवच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही परदेशी देशाला सरकारने दिलेली ही तिसरी मोठी मदत असली तरी, याआधी दिलेल्या मदतीच्या तुलनेत त्यात कपात करण्यात आली आहे. २०२३-२४ मध्ये सरकारने मालदीवला ७७०.९० कोटी रुपयांची मदत दिली होती. २०२२-२३ मध्ये १८३.१६ कोटी रुपये देण्यात आले होते. ही मदत परराष्ट्र मंत्रालयामार्फत मालदीवला विविध योजनांतर्गत दिली जाते.
गेल्या काही वर्षांपासून मालदीवला आर्थिक मदत पुरविण्यात भारत आघाडीवर आहे. भारताने मालदीवला संरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये खूप मदत केली आहे. तथापि, केवळ मालदीवच्या अर्थसंकल्पातच कपात केली गेली नाही तर, सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी परदेशातील मदतीचे एकूण वाटप १० टक्क्यांनी कमी केले आहे. भारताने २०२४-२५ साठी परदेशी देशांना मदतीसाठी ४८८३.५६ कोटी रुपये दिले आहेत.
गेल्या वर्षी मोहम्मद मुईझ्झू यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतासोबतचे संबंध बिघडू लागले. मुईझ्झू हे चीन समर्थक नेते मानले जातात. इंडिया आऊट मोहीम राबविणारे मुईझ्झू राष्ट्रपती होताच त्यांनी मालदीवमध्ये उपस्थित भारतीय सैनिकांना परतण्यासाठी सांगितले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये राजनैतिक वादही सुरू झाला. याचे कारण म्हणजे मालदीवच्या काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलेली आक्षेपार्ह टिप्पणी.
नवीन वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट दिली आणि काही छायाचित्रे शेअर केली. सुंदर फोटो पाहून सोशल मीडियावर लोक लक्षद्वीपची तुलना मालदीवशी करू लागले. पर्यटनावर अवलंबून असलेल्या मालदीवचे नेते यामुळे नाराज झाले आणि त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यास सुरुवात केली. यानंतर भारतीयांनी मालदीववर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली.