किमान तापमान : 29.71° C
कमाल तापमान : 31.9° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 69 %
वायू वेग : 1.95 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.9° C
29.16°C - 32.99°C
sky is clear29.08°C - 30.31°C
sky is clear28.89°C - 31.01°C
sky is clear28.97°C - 30.48°C
sky is clear28.69°C - 29.96°C
few clouds28.76°C - 30.02°C
broken cloudsनवी दिल्ली, (२१ जानेवारी) – अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशभरातून जवळपास आठ हजारावर मान्यवरांना बोलवण्यात आले. यात समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी कोणाला आमंत्रित करायचे, याचे काही निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार निमंत्रणे पाठवण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आले. मात्र, हे निमंत्रण ज्येष्ठ भाजपा नेते वा माजी केंद्रीय मंत्री म्हणून नव्हते, तर रामललाचे वकील म्हणून होते. रविशंकर प्रसाद ख्यातनाम वकील आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयातील रामजन्मभूमी बाबरी मशीद खटल्यात प्रसाद रामललाचे वकील होते. रामललाच्या बाजूने त्यांनी प्रभावी असा युक्तिवाद केला होता. तो अतिशय परिणामकारक ठरला आणि रामललाने खटला जिंकला. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले तेव्हा प्रसाद यांना रामललाचे वकील म्हणून बाजू मांडता आली नाही. कारण, ते तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयातही रामलला विजयी झाला. म्हणूनच रामललाचे वकील म्हणून रविशंकर प्रसाद यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले.