किमान तापमान : 30.87° C
कमाल तापमान : 32.28° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 6.52 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.28° C
28.14°C - 32.99°C
sky is clear28.46°C - 31.17°C
sky is clear28.9°C - 33.02°C
sky is clear29.05°C - 32.57°C
sky is clear28.8°C - 32.08°C
sky is clear28.33°C - 31.04°C
sky is clearपुणे, [१४ एप्रिल] – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेले २२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य समेलन २३ आणि २४ मे रोजी तुळजापूर येथे होणार आहे, अशी माहिती परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
माजी मंत्री लक्ष्मण ढोवळे यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, कथाकथन आदी कार्यक्रम होणार असून त्यात देशभरातून ७०० ते ८०० नवोदित साहित्यिक सहभागी होणार आहेत, असे दशरथ यादव यांनी सांगितले. परिषदेचे १२ हजारहून अधिक साहित्यिक सभासद असून गोवा, कर्नाटक, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी ३५० शाखा कार्यान्वित आहेत. संस्थेच्या वतीने १० राज्यस्तरीय साहित्स संमेलन महाराष्ट्रात विभागवार घेतले जातात. यापूर्वी नवोदित साहित्य संमेलन पुणे, लातूर, सोलापूर, औरंगाबाद, रत्नागिरी, उदगीर, नवी मुंबई आदी ठिकाणी पार पडले आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांच्याकडे विनंती करण्यात आली आहे, असे गोरे यांनी सांगितले.