|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:02 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.85° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 29 %

वायू वेग : 6.56 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.18°C - 34.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.02°C - 32.5°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.43°C - 31.89°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.58°C - 30.78°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 03 May

27.35°C - 30.23°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.13°C - 30.31°C

few clouds
Home » प.महाराष्ट्र » देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे योगदान आवश्यक

देशाच्या विकास प्रक्रियेत तरुणांचे योगदान आवश्यक

– केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचे आवाहन,
पुणे, (२८ ऑक्टोबर) – सरकारी नोकरी ही सुवर्णसंधी समजून त्या माध्यमातून देशाच्या विकास प्रक्रियेत मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय रेल्वे , कोळसा आणि खाण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज केले. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या भारतीय रेल्वे सिव्हील इंजिनियरिंग इन्स्टिट्युट मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . त्यांच्या प्रमुख उपस्थितीत एकंदर ८० जणांना यावेळी सरकारी नोकरीची नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे पाटील पुढे म्हणाले की सरकारच्या कारभारात आता पूर्णपणे पारदर्शकता आली असून त्यामुळेच केवळ गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकरी मिळण्याची पद्धत अमलात आली आहे. २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असून त्यावेळी जगाच्या पाठीवर विकसित आणि सर्वार्थाने बलाढ्य देश म्हणून भारताची ओळख संपूर्ण जगाला व्हावी यासाठीचे नियोजन आत्तापासूनच सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोन वर्षांपूर्वी आलेली कोविड ची साथ असो किंवा जी २० परिषद असो , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांमुळे आज संपूर्ण जगात भारताचे नाव आदराने घेतले जात असल्याचे सांगून दानवे पाटील पुढे म्हणाले की , आज देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर पोचली असून आगामी २५ वर्षात आणखी खूप काही बदल होणार आहेत . सक्षम नेतृत्व असेल तर देशात अनेक चांगल्या व्यवस्था निर्माण होऊ शकतात हे गेल्या ९ वर्षात देशवासीयांनी अनुभवले आहे.

Posted by : | on : 29 Oct 2023
Filed under : प.महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g