किमान तापमान : 29.6° C
कमाल तापमान : 31.19° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 75 %
वायू वेग : 2.26 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.19° C
28.55°C - 31.99°C
scattered clouds28.46°C - 30.36°C
scattered clouds28.75°C - 29.85°C
scattered clouds28.52°C - 29.74°C
broken clouds28.56°C - 30.53°C
light rain28.67°C - 30.1°C
light rainमुंबई, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मागील काही दिवासांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. शिवाय, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्या करीत आहेत. या पृष्ठभूमीवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार कुटुंबावर टीका केली आहे. दरेकर म्हणाले, पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांची ‘अॅलर्जी’ आहे. त्यांच्याकडून सातत्याने द्वेष, तिरस्कार करीत टोकाचे राजकारण करण्यात आले आहे. एक लोकनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. याचा त्यांना पोटशूळ आहे. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांविषयी चांगले बोलणे अपेक्षितच नाही.
आ. प्रकाश सोळुंके यांनी मराठा आंदोलनादरम्यान त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत केलेल्या विधानावरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वतः सांगत आहेत, त्यांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोेलबॉम्ब, दगड आदी होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असेही त्यांचे म्हणणे आहे. ते गृहखाते आणि गृहमंत्री महोदयांचे अपयश अधोरेखित करीत आहेत, असेही सुप्रिया म्हणाल्या होत्या.
सुप्रिया सुळे या प्रत्येक घटनेचा संबंध गृह खात्याशी जोडतात आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात, यावरूनच त्यांच्या मनात काय आहे, हे दिसून येत असल्याचे दरेकर म्हणाले.