किमान तापमान : 29.43° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 74 %
वायू वेग : 5.89 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
29.24°C - 33.01°C
sky is clear28.93°C - 32.9°C
sky is clear28.76°C - 32.34°C
sky is clear27.89°C - 30.45°C
few clouds27.53°C - 29.91°C
sky is clear27.37°C - 30.22°C
sky is clearमृत्युमुखी पडलेल्यांत बहुतांश महिला,
पुणे, ७ जून – पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एसव्हीएस रसायन कंपनीला आज सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात १५ महिलांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
मुळशीतील अरवडे गावाजवळील एसव्हीएस कंपनीला आज दुपारी दोन वाजताच्या सुमास भीषण आग लागली. यावेळी बहुतांश महिलांसह जवळपास ३७ मजूर काम करीत होते. यात १५ महिला आणि दोन पुरुषांचा मृत्यू झाला असून, काही मजूर अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. जेसीबीच्या साह्याने भिंती फोडून काहीजणांना बाहेर काढण्यात आल्याने अनेकांचे प्राण वाचवण्यात आल्याची माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली.
या ठिकाणी निर्जंतुकीकरण द्राव तयार करण्यात येत होते. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली व मजुरांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. काही मजूर आतच अडकल्याने मृतांचा आकडा वाढल्याचे सांगण्यात येते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींबाबत कोणतेही वृत्त हाती आले नाही. हाती आलेले सर्व मृतदेह पूर्णपणे खाक झालेल्या अवस्थेत मिळाले, अशी माहिती स्थानिक आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
आत अडकलेल्या मजुरांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य न झाल्याने हे प्रयत्न अपयशी ठरले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कारखान्यातील धुराचे लोट चार किमी अंतरावरून दिसत होते.
राष्ट्रीय प्रयोगशाळेतही आग
पाषाण रोड येथे असलेल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (नॅशनल केमिकल लॅबॉरटरी-एनसीएल) मुख्य इमारतीमधील प्रयोगशाळा क्रमांक १८० मध्ये आज दुपारी आग लागली. कर्मचार्यांनी तत्काळ अस्थायी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझविण्याचे प्रयत्न केले. नंतर पाषाण अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली. कर्मचार्यांच्या दक्षतेने घटनास्थळी असलेले ज्वालाग्रही पदार्थ ताबडतोब बाजूला हटविण्यात आल्यामुळे मोठा धोका टळल्याचे सूत्रांनी सांगितले.