किमान तापमान : 29.18° C
कमाल तापमान : 30.39° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 68 %
वायू वेग : 5.26 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.39° C
29.94°C - 32.03°C
sky is clear28.92°C - 31.92°C
sky is clear28.75°C - 31.38°C
sky is clear28.1°C - 29.72°C
few clouds27.91°C - 29.21°C
sky is clear27.73°C - 29.38°C
sky is clearपुणे, १९ जुलै –
आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचे आज सोमवारी पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. पंढरीच्या वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. या मानाच्या पालखीचे आज पहाटे मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने प्रस्थान झाले. सायंकाळी उशीरा या पालख्या पंढरीत दाखल झाल्या. ३० वारकर्यांनाच पालखीसोबत चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
यानंतर काही वेळातच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सजविलेल्या दोन शिवशाही बसमधून ४० वारकरी ग्यानबा तुकारामच्या जयघोषात मार्गस्थ झाले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार टाळकरी-मानकरी यांची निवड करण्यात आली. सोबत वैद्यकीय पथकही आहे. संत तुकोबांची पालखी रवाना होण्याआधी तुकोबांच्या पादुका मंदिरातून थेट इनामदार वाड्यात आल्या. इनामदार वाडा हे तुकोबांचे आजोळ असल्याने, तिथे आरती झाल्यानंतर पादुका शिवशाहीने पंढरीकडे रवाना झाल्या होत्या.
श्री संत सोपानकाका आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज यांची पालखी देखील बसने पंढरपूरकडे रवाना करण्यात आली. त्याआधी मंदिरात पूजा करण्यात आली. यावेळी वारकर्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. संपूर्ण रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीने देखील एसटीमधून पंढरपूरकडे प्रस्थान केले होते.