किमान तापमान : 29.72° C
कमाल तापमान : 31.9° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 73 %
वायू वेग : 5.21 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.9° C
28.72°C - 32.99°C
overcast clouds28.59°C - 30.85°C
scattered clouds28.63°C - 30.61°C
scattered clouds28.59°C - 30.22°C
scattered clouds28.52°C - 30.88°C
light rain28.92°C - 30.67°C
light rainमुंबई, (०४ जानेवारी) – १९९२ साली भाजपाची सारी लोकं अयोध्येत होती. मीसुद्धा होतो. जे ठाकरे गटाचे लोकं आज श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापैकी कोणीही तेथे नव्हता. एका मुलाखतीत बाबरी पाडणार्यांमध्ये तुमचे लोक आहेत का? असा प‘श्न विचारल्यावर, ‘ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे,’ असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. हे साधे वाक्य होते. मात्र, जे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी बाळासाहेबांच्या या वाक्याचा आधार घेऊन श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच करून उबाठाच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळल्याने, जळफळाट झालेल्या उबाठाचे नेते संजय राऊतांनी एक व्हिडीओ सार्वजनिक करून, फडणवीसांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याला लागलीच भाजपाने क्षणाचाही विलंब न करता संजय राऊतांचाच एक व्हिडीओ सार्वजनिक करून पलटवार केला.
तथाकथित रामभक्तांसाठी स्मरण गोळी-संजय राऊत
६ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील अतिशय दु:खद दिवस आहे, असे मी म्हणतो. ही फार मोठी चूक होती, यात काहीही शंका नाही. ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे सांगतानाच, निषेध केल्याबाबतचे वक्तव्य असल्याचा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा व्हिडीओ ट्विट करून, उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी, महाराष्ट्रातील फडणवीस, गिरीश महाजन आणि आशिष शेलार वगैरे वगैरे तथाकथित राम भक्तांसाठी ही ‘स्मरणगोळी’ असून ती उगाळून घ्यावी. आणखीदेखील जालीम डोस आहेत. योग्य वेळी ते देऊच, अशा आशयाचा मजकूरही व्हिडीओसोबत टाकला.
तथाकथित मविआ नेत्यांसाठी आमच्याकडे देखील जालीम डोस : भाजपा
संजय राऊत यांच्या व्हिडीओच्या टीकेला भाजपानेदेखील तत्काळ व्हिडीओने दिली आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ सार्वजनिक केला असून, या व्हिडीओमध्ये संजय राऊत बोलताना दिसत असून, ते म्हणत आहेत की, आपल्याला अयोध्येत जर का राम मंदिर हवे असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. फक्त अयोध्येत राम मंदिर नको आहे जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर लाहोर आणि कराचीमध्येसुद्धा आम्ही त्याच पद्धतीने राम मंदिर बांधू. कारण, आता पाकिस्तान फार काळ राहणार नाही. या व्हिडीओसोबत भाजपाने श्रीमान उद्धव ठाकरे, श्रीमान संजय राऊत, श्रीमान आदित्य ठाकरे वगैरे वगैरे तथाकथित मविआचे नेते… तुम्हीही ही ‘स्मरण गोळी’ उगाळून घ्या… आमच्याकडेदेखील आणखी जालीम डोस आहेत… योग्य वेळी देत राहूच… असा टोला लगावला आहे.