किमान तापमान : 31.26° C
कमाल तापमान : 33.08° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.74 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.08° C
28.39°C - 33.99°C
sky is clear29.11°C - 33.06°C
sky is clear28.93°C - 32.79°C
sky is clear28.79°C - 32.44°C
sky is clear28.01°C - 30.67°C
sky is clear27.53°C - 29.98°C
sky is clear– पंतप्रधान मोदींनी ट्विट करून माहिती दिली,
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने ’भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात देशासाठी अतुलनीय योगदान देणार्या व्यक्तींना ’भारतरत्न’ देऊन सन्मानित केले जाते. अडवाणी यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लालकृष्ण अडवाणी ५ वेळा लोकसभेतून आणि ४ वेळा राज्यसभेतून खासदार राहिले आहेत. लालकृष्ण अडवाणी हे भारतीय जनता पार्टीचे तीन वेळा अध्यक्षही राहिले आहेत. २००२ ते २००४ या काळात ते देशाचे उपपंतप्रधानही होते.
यावेळी पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना या सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात आदरणीय राजकारणी, भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे आयुष्य व्यापलेले आहे. त्यांनी आमचे गृहमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केले. मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय आणि समृद्ध अंतर्दृष्टींनी भरलेले राहिले आहेत.
कराचीत शिक्षक ते भारताचे उपपंतप्रधान; लालकृष्ण अडवाणी यांचा राजकीय प्रवास
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म सध्या पाकिस्तानचा भाग असलेल्या कराची येथे ८ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. त्यांनी सुरुवातीला कराचीत शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आणि नंतर भारताचे उपपंतप्रधानपदही भूषवले. त्यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिली आहे.
हिंदुस्थानची फाळणी करणे ही ब्रिटिशांची चूक होती. तर आणिबाणी स्वदेशी सत्ताधार्यांची चूक आहे, असे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या नेतृत्त्वाला लालकृष्ण अडवाणी यांनी ठणकावले होते. राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि स्व: सर्वांत अखेर, हे तत्त्व पाळत राजकारणात आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा देशहित आणि पक्षाला प्राधान्य देणारे नेते अशी त्यांची देशभरात ओळख आहे. १९९० च्या दशकात अयोध्येतील राम मंदिरासाठी त्यांनी काढलेली रथयात्रा हा जगभरात चर्चेचा विषय ठरला होता.
अडवाणी यांचा जन्म कराची येथे ८ नोव्हेंबर १९२७ रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. त्यांचे वडील किशनचंद अडवाणी उद्योजक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराचीतील सेंट पॅट्रिक हायस्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांनी डीजी नॅशनल स्कूल, हैदराबाद, सिंधमध्ये प्रवेश घेतला. कराचीतील मॉडल हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले.
तारुण्यात फाळणीची झळ
ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली. अडवाणी कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबईत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. १९७० मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. १९८० मध्ये भाजपाची स्थापना झाली. पक्षाच्या स्थापनेपासून देशभरात पक्ष रुजविण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये रा. स्व. संघाच्या प्रचारक कार्यात अनेक वर्षे योगदान दिले. भाजपाच्या पायाभरणी करणार्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
१९८० मध्ये भाजपाला लोकसभेच्या दोन जागांवर विजय मिळवला. यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत १९८० ते १९९० या दहा वर्षांमध्ये भाजपाला राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून ओळख निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच दोन जागांवरून भाजपाने पुढील निवडणुकीत ८६ जागा मिळाल्या. १९९२ मध्ये १२१ आणि १९९६ मध्ये १६१ जागांपर्यंत भाजपाने झेप घेतली. काँग्रेसनंतर भाजपा हा सर्वाधिक खासदार असणारा पक्ष ठरला. १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या कालावधीत अडवाणी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले.
राजकीय यात्रा आणि अडवाणी
विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी चळवळ सुरू केली. दुसरीकडे १९९० च्या दशकात अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजपा राम मंदिर आंदोलनाचा चेहरा बनला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर १९९० रोजी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ येथून राम रथयात्रेला सुरुवात केली होती. अडवाणी यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक रथयात्रा काढल्या. यात जनादेश यात्रा, सुवर्ण जयंती रथयात्रा, भारत उदय यात्रा, भारत सुरक्षा यात्रा आणि जनचेतना यात्रा आदींचा समावेश आहे.
चॉकलेट, चित्रपट आणि क्रिकेटचे चाहते
लालकृष्ण अडवाणी राजकारणात रमले असले, तरी त्यांना चॉकलेट, चित्रपट आणि कि‘केट याची विलक्षण आवड आहे. विशेष म्हणजे, ते चित्रपट समीक्षकही राहिले आहेत.
वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान
लालकृष्ण अडवाणी यांनी २००२ ते २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. याआधी ते १९९८ ते २००४ दरम्यान भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री होते. दहाव्या आणि चौदाव्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले. २०१५ मध्ये त्यांना देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी आपला जीवनप्रवास ‘प्रवास माय कंट्री, माय लाईफ’ नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे.