किमान तापमान : 28.56° C
कमाल तापमान : 30.18° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 2.22 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.18° C
28.29°C - 30.99°C
overcast clouds28.45°C - 30.22°C
scattered clouds28.55°C - 29.67°C
broken clouds28.49°C - 30.14°C
broken clouds28.53°C - 30.25°C
light rain28.93°C - 29.93°C
light rain– राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन,
– विविध पक्षांतील नेत्यांना भाजपात घेण्यासाठी समिती,
नवी दिल्ली, (०२ जानेवारी) – अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या रामललाच्या मंदिरात २२ जानेवारीला होणार्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या तयारीच्या दृष्टीने भाजपातर्फे राजधानी दिल्लीत आज एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा, भाजपा महासचिव सुनील बन्सल यांच्यासह अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. या वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राममंदिराच्या बांधकामाचा तसेच मंदिरातील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुद्दा प्रभावीपणे जनतेपर्यंत नेण्याच्या योजनेवर या बैठकीत चर्चा करून त्याला अंतिम रूप देण्यात आले. राममंदिर आंदोलन आणि राममंदिराच्या उभारणीत भाजपाच्या असलेल्या योगदानाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपातर्फे एक पुस्तिकाही लवकरच प्रकाशित केली जाणार आहे.
राममंदिराच्या निमित्ताने बुथपातळीपर्यंत जनसंपर्क अभियान राबवण्याची तयारी भाजपाने केली असून, या अभियानांतर्गत जनतेपर्यंत ही पुस्तिका पोहोचवली जाणार आहे. राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या २२ जानेवारीच्या होणार्या कार्यक्रमाच्या दृष्टीने आयोजित विविध कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या व्यूहरचनेवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. काही कारणाने पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांची नाराजी दूर करीत, त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. विविध पक्षांचे नेते भाजपात येण्यास उत्सूक आहे; मात्र हे नेते खुलेआम तसे बोलायला तयार नाही. त्यामुळे या नेत्यांशी चर्चा करून त्यांना पक्षात घेण्यासाठी आठ सदस्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या समितीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा, भाजपा महासचिव सुनील बन्सल, विनोद तावडे, तरुण चुघ प्रभृतींचा समावेश आहे. या समितीने हिरवा झेंडा दाखविल्यानंतरच अन्य पक्षातील नेत्यांच्या भाजपा प्रवेशाचा मार्ग प्रशस्त होणार आहे.