|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.77° C

कमाल तापमान : 28.36° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 57 %

वायू वेग : 2.94 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.77° C

Weather Forecast for
Saturday, 04 May

27.41°C - 30.24°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.7°C - 30.89°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.18°C - 31.32°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.41°C - 30.74°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.99°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.74°C - 29.94°C

sky is clear

आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावुक!

आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावुक!गुलाम नबींनी पक्षासोबतच देशाचीही चिंता केली, नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पक्षासोबत देशाचीही चिंता केली, तसेच विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात काम करताना आदर्श निर्माण केला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी काढले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त होत आहे. त्यांना निरोप देण्याच्या समारंभात मोदी अतिशय भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. आझाद माझे जवळचे मित्र आहेत, विरोधी...10 Feb 2021 / No Comment /

टागोरांच्या खुर्चीवर मी नाही, नेहरू बसले होते

टागोरांच्या खुर्चीवर मी नाही, नेहरू बसले होतेअमित शाह यांचा पलटवार, नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विश्‍वभारतीला दिलेल्या भेटीच्या काळात रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला होता, ते त्यांच्या खुर्चीवर बसले होते, असा आरोप करणारे कॉंग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांचा अमित शाह यांनी आज मंगळवारी खरपूस समाचार घेतला. टागोरांच्या खुर्चीवर मी नाही, तर नेहरू बसले होते, अशी चपराक अमित शाह यांनी हाणली. अमित शाह यांच्या बंगालमधील शांतीनिकेतनच्या दौर्‍यावरून अधीररंजन यांनी सोमवारी सभागृहात बोलताना...10 Feb 2021 / No Comment /

आंदोलन मागे घ्या, चर्चेसाठी या: पंतप्रधान मोदी

आंदोलन मागे घ्या, चर्चेसाठी या: पंतप्रधान मोदीकिमान हमीभाव होता, आहे, उद्याही कायम राहील, कृषी कायद्यातील त्रुटी व कमजोरी दूर करण्याची तयारी, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी – शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेऊन पुन्हा चर्चेसाठी समोर यावे, संसदेच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित करतो. आमचे दरवाजे चर्चेसाठी नेहमीच उघडे आहेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी केले. किमान हमीभावाची व्यवस्था कायम होती, आजही आहे आणि पुढेही कायम राहील, असा निर्वाळाही त्यांनी दिला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर...9 Feb 2021 / No Comment /

देशात नवी जमात आली, आंदोलनजीवी

देशात नवी जमात आली, आंदोलनजीवीअशा लोकांना ओळखा, सावध राहा: पंतप्रधानांनी काढला विरोधकांचा जोरदार चिमटा, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी – श्रमजीवी, बुद्धिजीवी यासोबतच गेल्या काही दिवसांत देशात एक नवीन जमात समोर आली आहे, ती म्हणजे आंदोलनजीवी. या जमातीचे लोक आपल्याला सर्वत्र दिसतील. वकिलांचे आंदोलन असो, विद्यार्थ्याचे आंदोलन असो की, कामगारांचे, या जमातीचे लोक आपल्याला सर्वच ठिकाणी दिसतील. कधी हे लोक पडद्यासमोर असतात, तर कधी पडद्यामागे, असा जोरदार चिमटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी राज्यसभेत...9 Feb 2021 / No Comment /

लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू

लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरूराजनाथसिंहांच्या आवाहनाला विरोधकांचा प्रतिसाद, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला आज सोमवारी अखेर लोकसभेत प्रारंभ झाला. तत्पूर्वी, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून झालेल्या गोंधळामुळे आज पाचव्या दिवशीही लोकसभेचे कामकाज स्थगित करावे लागले होते. मात्र, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलेल्या प्रतिसादाला आवाहनाला विरोधकांनी प्रतिसाद दिल्याने सदनात धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. आज लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. त्याचवेळी विरोधी सदस्यांनी हातात फलक घेत अध्यक्षांच्या...9 Feb 2021 / No Comment /

कंत्राटी शेतीवर विरोधकांचा अपप्रचार : नरेंद्रसिंह तोमर

कंत्राटी शेतीवर विरोधकांचा अपप्रचार : नरेंद्रसिंह तोमरनवी दिल्ली, ५ फेब्रुवारी – कंत्राटी शेतीमुळे तुमची जमीन जाईल, असा अपप्रचार करून शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. मात्र शेतकर्‍यांची जमीन जाईल, असे कोणत्या कायद्यात लिहिले आहे, असे कोणी सांगायला तयार नसल्याचा घणाघात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज शुक्रवारी राज्यसभेत केला. कॉन्ट्रॅक्टमधून कोणत्याही क्षणी शेतकरी बाहेर निघू शकेल, अशी तरतूद या कायद्यात आहे, याकडे लक्ष वेधत तोमर म्हणाले की, मात्र व्यापार्‍याशी केलेल्या अशा करारात आधी पूर्ण...6 Feb 2021 / No Comment /

लोकसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज स्थगित

लोकसभेत पुन्हा गदारोळ; कामकाज स्थगितनवी दिल्ली, ५ फेब्रुवारी – कृषी कायद्यावरून झालेल्या गोंधळामुळे आज लागोपाठ चौथ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज अनेक वेळा स्थगित करावे लागले. गोंधळ शांत होत नसल्यामुळे शेवटी सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज सोमवारपयर्र्त स्थगित केले. सभागृहाच्या कामकाजाला आज प्रारंभ होताच बिर्ला यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला, त्याचवेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हातात पोस्टर्स घेत सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. ‘तानाशाही नही चलेंगी’, अशा घोषणा हे सदस्य देत होते. यामुळे सभागृहात प्रचंड...6 Feb 2021 / No Comment /

कृषी क्षेत्रानेच तारले!; आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर

कृषी क्षेत्रानेच तारले!; आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादरपुढील वर्षी आर्थिक विकासाचा दर ११ टक्के, चालू वर्षात अर्थव्यवस्था उण्यावरच राहणार, नवी दिल्ली, २९ जानेवारी – कोरोना महामारीच्या सावटातून देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने सावरत असली, तरी चालू आर्थिक वर्षात विकासाचा दर उण्यावरच राहणार आहे. तथापि, पुढील आर्थिक वर्षाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ११ टक्के या गतीने विकास करणार आहे. कोरोना संकटाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा मोठा हातभार लागला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक...30 Jan 2021 / No Comment /

दोन दिवस आधीच संपणार अधिवेशनाचा पहिला टप्पा

दोन दिवस आधीच संपणार अधिवेशनाचा पहिला टप्पानवी दिल्ली, २९ जानेवारी – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ ऐवजी १३ फेब्रुवारीला संपणार आहे, अशी माहिती सूत्रांनी आज शुक्रवारी दिली. मात्र, कामकाजाचे एकूण दिवस तितकेच राहतील, असेही स्पष्ट केले. याबाबत लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीसोबत चर्चा करण्यात आली. पूर्वीच्या निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे हा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत होणार होता. मात्र, आता हा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपणार असून, त्यानंतर ८ मार्चपासून दुसरा टप्पा सुरू होईल. त्यामुळे कामकाजाचे एकूण दिवस तितकेच...29 Jan 2021 / No Comment /

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासूननवी दिल्ली, १४ जानेवारी – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २९ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने आज सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन बोलवण्याबाबतची अधिसूूचना राष्ट्रपतींनी आज जारी केली. २९ जानेवारीला सकाळी ११ वाजता संसदेच्या मध्यवर्ती कक्षात होणार्‍या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण मांडले जाईल....14 Jan 2021 / No Comment /

भाजपाचे ८, सपा-बसपाचे प्रत्येकी १ राज्यसभेवर बिनविरोध

भाजपाचे ८, सपा-बसपाचे प्रत्येकी १ राज्यसभेवर बिनविरोधनवी दिल्ली, २ नोव्हेंबर – उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने आठ तर सपा आणि बसपा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. भाजपाच्या विजयी उमेदवारांत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री हरदीपसिंग पुरी, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरजशेखर, माजी पोलिस महासंचालक ब्रिजलाल, बी. एल. शर्मा, हरिद्वार दुबे, गीता शाक्य आणि सीमा द्विवेदी यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव तर बसपाचे रामजित गौतमही वरिष्ठ सभागृहात पोहोचले. राज्यसभेच्या...3 Nov 2020 / No Comment /