|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.4° C

कमाल तापमान : 32.79° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 50 %

वायू वेग : 8.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.79° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.23°C - 33.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » विविधा » ऐकून तर बघा

ऐकून तर बघा

listenबोलणं न ऐकणं म्हणजे दुसर्‍याचा अपमान, उपेक्षा, दुर्लक्ष, उद्दामपणा व माणुसकी नसलेलं वर्तन. एकमेकांचे बोलणे नीट ऐकून घेतल्या जात नाही म्हणून संबंधांमध्ये कटुता निर्माण होते. मानसशास्त्रज्ञांच्या मते लक्षपूर्वक ऐकणं, हा संबंध टिकविणे, यश मिळविणे याचा कणा आहे. जितका माणूस लक्षपूर्वक ऐकेल तितका तो सुखी होईल.
ऐकणे ही नुसती शारीरिक क्रिया मानल्या जात नाही. शारीरिकदृष्ट्या ऐकणं हे वेगळं, त्यामध्ये ऐकून न ऐकल्यासारखे केले जाते ते संबंध टिकत नाहीत. सुसंवाद होत नाही. बाहेर किंवा घरी ते संबंध टिकविण्यात अयशस्वी होतात. सर्वात महत्त्वाचे घटक कोणते हा विचार केला तर पती, पत्नी, मुलं, आईबाप, मुले व शिक्षक, मालक-मजूर हे महत्त्वाचे व अपरिहार्य संबंध आहेत व न तुटता येणारे आहेत. दीर्घकालीन आहे. अतिपरिचयाचे असतात, पण याच संबंधात तक्रारी सुरू असतात.
ऐकणं म्हणजे कानानेच ऐकायचे असे नाही. बोलण्याचा अर्थ काय आहे, हे कळणं म्हणजे जे बोलतो त्याकडे लक्ष द्यावे लागणार. आपले भाष्य करणे ऐकले जावे तेव्हा त्याचं मन त्यात असेलच असे नाही. बायको बोलते व नवरा हॉं, हूँ करतो. समजा एखादे पुस्तक वाचत असेल तेव्हा ती चिडते. पुस्तक ओढते व मग खोचक बोलते नाहीतर, थोडा धाक दाखवते. लक्ष द्या, नाहीतर बघा.
पेपर वाचीत असताना सामानाची लिस्ट ऐकणारा पती दुसरेच सामान आणतो. दुहेरी नुकसान. पत्नी चिडते, ‘विसराळू’ ही पदवी त्याला देते.
वर्गात शिक्षक जीव तोडून शिकवितात. मुले काहीतरी कारभार करतात. पण, मुलांचं न ऐकणं समजतं. काही मुले शिक्षकांकडे बघतात ती ऐकत नसतात, आपल्याच विश्‍वात गर्क असतात. काही अनुभवी व हुशार शिक्षक अशा मुलांना पकडतात. वर्गात लक्ष देणं हा महत्त्वाचा भाग, पण अशा क्रिया घडतच असतात. अडचणी निर्माण होतात. लक्ष दिले तर विषय समजून घेऊन शिकता येतो, ग्रहण करता येते. गाईड्‌स वापरणं, नोट्‌स वापरणं, ही पाठांतराची क्रिया होते, पण लक्ष देणं म्हणजे आत्मसात करता येते. स्मरणशक्ती वाढते. केवळ रागावूनच काम घेतले तरी होणार नाही, भीती निर्माण होते व काम नीट होत नाही. ऑफिसमधले कर्मचारी काळजीत असतात, पण काम करतात. मन मात्र चूप नसतं. संसार चालविणे या महत्त्वाच्या भागामुळे ते काम करतात. घरी लक्ष देऊ शकत नाही. मुले ऐकत नाही. मग काम करताना चिंता करतात. मुलांची चिंता असते, कधी ऑफिसमधले प्रश्‍न असतात. परिणाम असा होतो की, कामात लक्ष लागत नाही व कामात चुका होतात. मत्सर, ईर्ष्या, क्रोध, निराशा अशा भावना किंवा नुसतेच गृहीत धरणे, बेपर्वाई, अकर्तव्यदक्ष, वेळेचं महत्त्व न समजणं, टाळाटाळ करणे, वेळ काढून नेणे. यामुळे माणूस मनाने ऐकत नाही. फक्त कानाने ऐकतो व मग ऐकून न ऐकल्यासारखं करतो. कधी नकळतही होते, कधी मुद्दाम होते. मुलगा व पालक असेल तर पालक मागण्या पूर्ण करीत नाही म्हणून मुले ऐकत नाही. शिक्षक रागीट असेल तर विद्यार्थी ऐकत नाही. बॉस असेल तर कर्मचारी घाबरतात, मग काम नीट होत नाही. रागीट स्वरातील बोलणं ऐकणार्‍यापर्यंत पोहोचत नाही. फक्त कर्मचारी वाट पाहात कामात लक्ष घालत नाही. कोरडेपणाने बोलणी खातात, पण कमीपणा वाटत नाही. घरकामी स्त्रियांचे उदाहरण देता येईल. वादाचे कारण हेच एकमेकाला बोलू द्यायचं नाही व ऐकायचे नाही, वाद सुरू. भांडण संपत नाही व मग नीट न ऐकण्याने जीवनातल्या नात्यांना तडा जातो व राहावे तर सोबत लागते, पण मग मजा येत नाही. वैताग वाढतो, विचार बदलतात, दूर जाण्याचा विचार करतात, संबंध दुरावतात. आयुष्य हेच कठीण असतं. आपण त्याला खतपाणी घालून खडतर बनवितो. कटुत्व निर्माण होते, चिडचिड वाढते. हेवा, मत्सर यात वाढ होते. काम समजून घेणे, चुका झाल्या तर सुधारणे याची आवश्यकता वाटत नाही. वरिष्ठांकडून बोलणी खावी लागते. ज्यांची वृत्ती केवळ पोटार्थी आहे त्या माणसांना नीटनेटके काम करण्यात रस नसतो, अव्यवस्थित कामाने ऑफिसचे नुकसान होते. स्वत: बदलण्याची त्यांना आवश्यकता वाटत नाही, तेव्हा थोडे दोघांमध्ये सुसंवादाचे वातावरण निर्माण झाले तर बरे होईल. त्याकरिता काही गोष्टी लक्षात घ्याव्या.
१) दुसरा बोलत असल्यास शांतपणे न अडवता ऐकून घ्या, कदाचित चुकीचे बोलतही असेल.
२) त्याच्या मताशी सहमत नसाल तर शांतपणे पटवून द्या व पूर्ण बोलणे झाल्यावर बोला. जर का मुद्दा मतभेदाचा असेल तर.
३) नाराजी व्यक्त करताना लागेल असे बोलू नये. आवाजात मृदुताच हवी, शब्द योग्य असावेत. एकदा सुटलेला बाण परत घेता येत नाही, तसे शब्द असतात. व्यक्तींबद्दल आकस नको. नाराजी कामाबद्दल आहे, तेव्हा व्यक्तिदोष न पाहता कामातील दोष पहावा.
४) त्यांच्या मर्मावर बोट ठेवू नका. मतभेद व्यक्त कराल, भांडण करू नको. शांतपणे मुद्याचं बोला. तुमच्या मर्यादेत काय सुधारणा करायची याचा आवाका लक्षात घ्या.
५) दोन माणसे बोलत असतात. एखादा तिसरा माणूस मध्येच बोलतो व मग पहिला चूप बसा, मग बघू, असे बोलतात. असे न करता तुमचा क्रम येईल तेव्हा बोला, सौम्यपणे सांगा. चेहरा व हातवारे भावना व्यक्त करतात व वातावरण तापवतात. आवाजाचा टोनही भांडायला मदत करतो, तेव्हा वेळीच आदराने शांतपणे प्रत्येकाचे ऐकणं, संघर्षावर हा रामबाण इलाज आहे.
६) भावनांवर नियंत्रण ठेवा. नियंत्रण सुटलं की, माणसाला समोरच्याचं बोलणं कानावर पडतं पण समजत नाही. संधी मिळत नाही, तेव्हा आपली किंमत नाही असे एखाद्याला वाटते. याचा राग येऊन उलट बोलले जाते किंवा काहीच बोलले जात नाही म्हणून ऐकून घ्या.
७) शांतपणे ऐकलं की, आपुलकी निर्माण होते, सहकार्य वाढीस लागते. न बोलताही भावना समजतात. संत रामदासांनी म्हटलं
आहे –
ऐकल्याने होत आहे रे आधी ऐकलेचि पाहिजे.
ऐकाल तर सुखी व्हाल.
अपयश आलं तरी न घाबरता मार्गक्रमण करा. यश तुमचेच.
कल्पना पांडे

Posted by : | on : 6 Feb 2013
Filed under : विविधा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g