|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.99° C

कमाल तापमान : 29.19° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 4.29 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.32°C - 31.22°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.38°C - 31.29°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.82°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.9°C - 32.28°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.21°C - 30.5°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » कार्यकर्त्यांनी जनतेचा विश्‍वास आणखी बळकट करावा

कार्यकर्त्यांनी जनतेचा विश्‍वास आणखी बळकट करावा

=भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आवाहन=
Raosaheb-Patil-Danveमुंबई, [७ ऑगस्ट] – ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाले आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता जनतेने आपल्याला साथ दिली आहे. जनतेचा हा विश्‍वास आणखी बळकट करण्याची जबाबदारी आपली असून, पक्ष कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारचे काम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी केले.
प्रदेश भाजपातर्फे पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाच्या अंतर्गत राज्य पातळीवरील प्रशिक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप करताना दानवे बोलत होते. उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या आवारात हा दोन दिवसांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. या वर्गाला पक्षाचे राज्यभरातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रशिक्षण प्रमुख उपस्थित होते.
रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, केंद्र व राज्यातील आपले सरकार अनेक चांगले निर्णय घेत आहे. हे निर्णय लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत प्रभावीपणे पोहचविण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना हे प्रशिक्षण उपयोगी पडेल. केंद्र सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे, तर राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. अशा स्थितीत आपली राजकीय भूमिका बदललेली असल्याचे ध्यानात घेऊन कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की, या महाअभियानादरम्यान पक्षाच्या राज्यातील एक लाख कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठी दोन महिन्यात ७०० प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतील. कार्यकर्त्यांची कामकाजाची पद्धती आणखी सुधारावी यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी पडेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. दोन दिवसांच्या या प्रशिक्षण वर्गात केंद्र सरकारचे यश या विषयावर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, एकात्म मानवतावाद या विषयावर आशुतोष पाठक, भाजपाचा इतिहास व विकास या विषयावर आमदार अतुल भातखळकर, भाजपाची कार्यपद्धती या विषयावर पक्षाचे राज्याचे सहप्रभारी खासदार राकेश सिंह, सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावर रमेश पतंगे, सरकार-संघटन समन्वय या विषयावर शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक सुरक्षा अभियान या विषयावर केंद्रीय विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन व आपला विचार परिवार या विषयावर रा. स्व. संघाचे पश्‍चिम क्षेत्र प्रचारक रवीजी जोशी यांचे व्याख्यान झाली.
ते म्हणाले की, राज्यात भाजपाची सदस्यसंख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. प्रशिक्षण महाअभियानामुळे लाखो प्रशिक्षित कार्यकर्ते तयार होतील आणि त्यामुळे भाजपा आणखी बळकट होईल.

Posted by : | on : 9 Aug 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g