|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.56° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.47°C - 30.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.45°C - 30.22°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.55°C - 29.67°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.49°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.53°C - 30.25°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.93°C - 29.93°C

light rain
Home » राजकीय, राष्ट्रीय » टिकैत यांच्या कुटुंबाला बॉम्बने उडवण्याची धमकी

टिकैत यांच्या कुटुंबाला बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली, (९ मार्च) – भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि त्यांच्या कुटुंबीयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिस याप्रकरणी तपास करत आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांचा मुलगा गौरव टिकैत यांच्या मोबाईलवर धमकीचे हे फोन आले. सुरुवातीला कोणाचा तरी खोडसाळपणा असेल असे समजून मी त्याकडे दुर्लक्ष केले, पण धमकी देणार्या फोनची संख्या वाढल्यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल केली, असे गौरव टिकैत यांनी सांगितले. ८ मार्चला म्हणजे धुळवडीच्या दिवशी रात्री ९.१५ ते १० वाजेदरम्यान धमकीचे हे फोन मला आले, फोन करणारा संपूर्ण टिकैत कुटुंबाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत होता, असे गौरव टिकैत यांनी सांगितले.
नरेश टिकैत आणि राकेश टिकैत यांनी भारतीय किसान युनियनशी असलेले आपले संबंध तोडावे, अशी धमकी या फोनद्वारे देण्यात आली. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत या धमकीबाबतची माहिती दिली. दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन करून आपण ठिक नाही केले, तुम्ही शेतकर्यांशी बोलणे थांबवा, भाकियुपासून दूर जा, तुम्ही या आंदोलनापासून दूर झाले नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी आम्हाला देण्यात आल्याचे टिकैत यांनी या पत्रात म्हटले आहे. आम्ही शेतकर्यांची लढाई लढत असतो, हे सामाजिक काम आहे, यासाठी आम्हाला देशभर प्रवासही करावा लागतो, त्यामुळे बाहेर राज्यात प्रवासावर असताना आमच्यासाठी सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे, त्याचप्रमाणे गृहमंत्रालयाने या धमकीची गंभीरपणे दखल घेत आम्हाला सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली.

Posted by : | on : 9 Mar 2023
Filed under : राजकीय, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g