किमान तापमान : 27.51° C
कमाल तापमान : 27.51° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 67 %
वायू वेग : 2.77 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.51° C
27.52°C - 30.55°C
sky is clear28.01°C - 30.97°C
sky is clear28.26°C - 30.45°C
scattered clouds27.82°C - 30.02°C
sky is clear27.66°C - 29.83°C
sky is clear27.67°C - 29.81°C
light rainजैसलमेर, (०४ सप्टेंबर) – राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की चांद्रयान-३ चंद्रावर उतरले आहे, परंतु राहुलयान अद्याप उतरले नाही किंवा प्रक्षेपित केले गेले नाही.
’परिवर्तन संकल्प यात्रे’ला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. हे आजपर्यंत कोणत्याही देशाला करता आलेले नाही. ते म्हणाले की, भारत चंद्रावर पोहोचला आहे. भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल १ देखील सूर्याच्या दिशेने निघाले आहे. यावरही काँग्रेस प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करते, पण देशाचा मूड पाहून त्यांनी मौन पाळले.
२० वर्षांपासून ’राहुल्यान’ लॉन्च होऊ शकले नाही
मंगळयान, चांद्रयान आणि सूर्ययान प्रक्षेपित झाले आणि उतरवले गेले, पण २० वर्षांपासून राहुलयान ना उतरवले गेले, ना प्रक्षेपित झाले, असे राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस ’हिंदू-मुस्लिम’ आणि ’मागास’ असा हवाला देऊन राजस्थानमध्ये पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.