किमान तापमान : 27.82° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 1.79 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.48°C - 30.38°C
sky is clear27.59°C - 30.24°C
sky is clear27.5°C - 29.74°C
sky is clear27.47°C - 30.36°C
sky is clear27.7°C - 29.77°C
sky is clear28.12°C - 30.09°C
overcast cloudsनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – पश्चिम आशियात सुरू असलेल्या हमास-इस्रायल युद्धाबाबत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे ओमानी समकक्ष बद्र अल्बुसैदी यांच्याशी चर्चा केली. ओमानाचे परराष्ट्र मंत्री अल्बुसैदी यांनी सोशल मीडिया साइटवर ही माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये लिहिताना ते म्हणाले, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चांगली चर्चा झाली. यादरम्यान, त्यांनी गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या अत्यावश्यक गरजेवर भर दिला. आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे अल्बुसैदी म्हणाले. सोशल मीडियावर पोस्ट करताना परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, ओमानाचे परराष्ट्र मंत्री बद्र अल्बुसैदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. तसेच पश्चिम आशियातील संकटावरही विचार विनिमय केला. मोठ्या संख्येने अरब देश हमास आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचे समर्थन करत आहेत.
तत्पूर्वी, जयशंकर यांनी सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान आणि यूएईचे त्यांचे समकक्ष शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली होती. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यात १,४०० हून अधिक लोक मारले गेले. हमासने गाझामध्ये २२० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे. गाझामधील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे ६,५०० लोक मारले गेले आहेत. भारताने २२ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाईनच्या लोकांना औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसह ३८ टन पेक्षा जास्त मदत सामग्री पाठवली.