|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.51° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 1.98 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

28.79°C - 31.87°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.06°C - 31.78°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 19 Apr

28.13°C - 30.39°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

27.53°C - 30.12°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

26.71°C - 29.55°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.32°C - 30.23°C

overcast clouds
Home » ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य » बिहारात भाजपाला रोखणे हेच लक्ष्य: जयराम

बिहारात भाजपाला रोखणे हेच लक्ष्य: जयराम

JAIRAM_RAMESHहैदराबाद, [१२ एप्रिल] – येत्या काही महिन्यात बिहारमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखणे हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले असून, एकप्रकारे प्रस्तावित जनता परिवारासोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही प्रभाव राहणार नाही, असा दावा रमेश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. जनता परिवाराची विखुरलेली ताकद एकत्र येत आहे, ही आनंदाची बाब आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. जनता परिवार ज्या संकटाचा सामना करीत आहे तसाच कॉंग्रेसही करीत आहे. बिहारची विधानसभा निवडणूक ही आम्हा सर्वांसाठी एक परीक्षा आहे. याचवर्षी दिल्लीत पार पडलेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरला. आता बिहारात भाजपाला रोखण्यात यश आले तर मोदी पूर्णपणे प्रभावहीन होतील, असे जयराम रमेश म्हणाले.
या पार्श्‍वभूमीवर भाजपाविरोधी ताकद एकजूट होत आहे, हा स्वागतार्ह घटनाक्रम असल्याचेही रमेश म्हणाले. कॉंग्रेस जयदुसोबत धोरणात्मक भागीदारी करणार का, असे विचारले असता, आम्ही नितीशकुमार यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे, अशी आठवण रमेश यांनी करून दिली. २०१९ ची निवडणूक जिंकणे हे कॉंग्रेसचे दीर्घकालीन धोरण असले तरी तत्कालीक लक्ष्य बिहारमध्ये भाजपाला रोखणे हेच आहे. यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असे स्पष्ट करतानाच याचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणावरही पडेल, असा दावाही त्यांनी केला.

Posted by : | on : 13 Apr 2015
Filed under : ठळक बातम्या, बिहार-झारखंड, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g