|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:10 | सूर्यास्त : 18:41
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 32.31° C

कमाल तापमान : 37.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 41 %

वायू वेग : 7.01 Mps

स्थळ : Mumbai, IN

37.99° C

Weather Forecast for
Wednesday, 17 Apr

29.62°C - 38.99°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 18 Apr

28.42°C - 29.77°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 19 Apr

27.86°C - 31.49°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.26°C - 30.8°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.82°C - 29.67°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.11°C - 29.43°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शिष्यवृत्ती परीक्षांचे पुनर्विलोकन करणार: तावडे

शिष्यवृत्ती परीक्षांचे पुनर्विलोकन करणार: तावडे

vinod-tawde2मुंबई, [१४ सप्टेंबर] – विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विशेष बुद्धिमत्तेचे मापन करण्याच्या दृष्टिकोनातून शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे तीन विषयांचा शिष्यवृत्ती परीक्षेत समावेश असावा, असा आग्रह शिक्षक आणि पालकांकडून शालेय शिक्षण विभागाकडे केला जात होता. या मागणीबाबत आपली मते विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवावीत, या मतांचा विचार करून शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
एप्रिल २०१० पासून राज्यात बालशिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. या कायद्यानुसार शालेय स्तर रचनेत बदल झाले. इयत्ता पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर, इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक स्तर, इयत्ता नववी ते १० वी माध्यमिक स्तर झाले आहेत, असे विनोद तावडे यांनी सांगितले. यानुसार इयत्ता ४ थी व ७ वी मध्ये होणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षांचे निकष बदलणे क्रमप्राप्त होते. परंतु, हा निर्णय अनेक वर्षे प्रलंबित होता. २९ जून २०१५ रोजी शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व इयत्ता ८वी मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणतः ८-१० वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेतील विषयांमध्ये फेरफार झाले. गणित, प्रथम भाषा, बुद्धिमत्ता या तीन प्रमुख विषयांमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, इंग्रजी या विषयांचा समावेश केला होता. त्यामुळे आता शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने शिष्यवृत्ती परीक्षांची पुनर्मांडणी करण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले.

Posted by : | on : 15 Sep 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g