किमान तापमान : 29.25° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 3.87 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
28.8°C - 29.99°C
sky is clear28.38°C - 29.98°C
sky is clear28.23°C - 29.83°C
sky is clear27.84°C - 29.32°C
sky is clear28.12°C - 29.82°C
light rain28.36°C - 29.87°C
broken cloudsमुंबई, (२५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने एका पत्राद्वारे केली आहे. याबाबत वंचितने शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी, म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. ही अंतिम मुदत नाही, पण आमच्या सोयीसाठी हे आवश्यक आहे; जेणेकरून आम्हाला कोणाशी चर्चा करायची आहे, हे समजू शकेल, असे या पत्रात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस तसेच दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील जागावाटप जाहीर झाले. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप रखडले आहे. या पृष्ठभूमीवर वांचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या सहीने आघाडीच्या नेत्यांना पत्र पाठविण्यात आले.
२२ फेब्रुवारीच्या पत्रपरिषदेत चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये ३९ जागांवर एकमत झाले असून, लवकरच २७ किंवा २८ फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे आम्हाला आतापर्यंत अंतिम झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती द्यावी. २ फेब्रुवारीला मुंबईत झालेल्या तीन पक्षाच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केली होती. आघाडीकडून वंचितला तीन पक्षांमध्ये झालेल्या जागा वाटपाची माहिती मिळाल्यास तीन पक्षांना वैयक्तिकरीत्या किती जागा लढवण्यासाठी दिलेल्या आहेत, ते समजण्यात मदत होईल. त्यामुळे त्या संबंधित पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी काही जागांसाठी वाटाघाटी करू शकेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.