किमान तापमान : 30.55° C
कमाल तापमान : 30.84° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 5.15 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.84° C
27.24°C - 30.99°C
few clouds27.63°C - 30.65°C
sky is clear27.77°C - 31.02°C
sky is clear28.29°C - 31.38°C
sky is clear28.45°C - 30.48°C
sky is clear27.86°C - 30.01°C
sky is clearबंगळुरू, (११ मार्च) – बंगळुरूमधील लोकांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सोमवारी सांगितले की, राज्याने गेल्या तीन-चार दशकांत इतका भीषण दुष्काळ पाहिला नाही. गेल्या ३०-४० वर्षांत इतका दुष्काळ आपण पाहिला नव्हता, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यापूर्वी दुष्काळ पडला असला, तरी एवढ्या मोठ्या संख्येने तालुके दुष्काळग्रस्त म्हणून आपण कधीच जाहीर केले नव्हते. शिवकुमार म्हणाले की जिथे कावेरी नदीचे पाणी पुरवठा करायचे आहे तिथे ते केले जात आहे, परंतु बेंगळुरूमधील १३,९०० बोअरवेलपैकी सुमारे ६,९०० बोअरवेल्स कामहीन झाले आहेत. ते म्हणाले, सरकारने सर्व गोष्टी आपल्या ताब्यात घेतल्या असून पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे.
विरोधी पक्ष (भाजप-जेडी(एस) युती) या मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला. ते म्हणाले की, पुढील दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत. जलसंपदा मंत्री शिवकुमार म्हणाले की, मे पर्यंत शक्य तितक्या लवकर ११० गावांना (बेंगळुरूच्या आसपास) कावेरीचे पाणी देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. शिवकुमार पुढे म्हणाले की, पाणी माफियांवर अंकुश ठेवण्यासाठी आतापर्यंत १,५०० हून अधिक खाजगी पाण्याच्या टँकरनी नोंदणी केली असून इतरांच्या नोंदणीची मुदतही १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), बीबीएमपी आणि बीडब्ल्यूएसएसबी यावर लक्ष ठेवतील आणि टँकरवर नोंदणी क्रमांक असलेला बोर्ड असेल. शिवकुमार म्हणाले की, बेंगळुरू, रामनगरा, मगडी, दोड्डाबल्लापुरा, होस्कोटे आणि आसपासच्या भागात सिंचनासाठी बोअरवेल आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तेथून पाणी बाहेर काढता यावे यासाठी आम्ही त्यांची मोजणी केली आहे.