किमान तापमान : 28.04° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 0.56 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
27.73°C - 30.24°C
sky is clear27.7°C - 30.01°C
sky is clear27.58°C - 29.99°C
sky is clear27.91°C - 30.39°C
sky is clear28.02°C - 30.38°C
scattered clouds28.04°C - 30.47°C
sky is clearवाराणसी, (०१ फेब्रुवारी) – वाराणसीतील ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात ३० वर्षांनंतर अखेर पूजा सुरू झाली. आज (१ फेब्रुवारी) पहाटे अनेक जण पूजा करण्यासाठी तळघरात पोहोचले आहेत. ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजा करण्यात आली. डीएम म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर तळघरातून रात्रभर बॅरिकेडिंग हटवण्यात आले आणि लोक पूजा करण्यासाठी जमू लागले. प्रत्यक्षात बुधवारी (३१ जानेवारी) हिंदू बाजूंना मोठा दिलासा देत न्यायालयाने हिंदूंना संकुलाच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय दिला होता.
या आदेशाला मुस्लीम पक्षाने न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी ’पीटीआयशी बोलताना याला दुजोरा दिला आणि सांगितले की, जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टाने व्यासजींचे नातू शैलेंद्र पाठक यांना तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हा न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात, वादी शैलेंद्र व्यास आणि काशी विश्वनाथ ट्रस्ट यांनी ठरवलेल्या पुजार्याकडून व्यास तळघरात असलेल्या मूर्तींचे पूजन आणि रागभोग करण्याची व्यवस्था सात दिवसांच्या आत करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. ज्ञानवापी मशिदीच्या वाजुखान्यासमोर बसलेल्या नंदी महाराजांसमोरील बॅरिकेडिंग हटवून रस्ता खुला करण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की १९९३ मध्ये तत्कालीन सपा सरकारच्या काळात बॅरिकेडिंग करून पूजा सेवा बंद करण्यात आली होती.